Categories: रायगड

पर्यटकांनी गजबजले अलिबागचे किनारे!

Share

अलिबाग (प्रतिनिधी) : पर्यटकांअभावी कोरोनाकाळात दोन वर्षे अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे व्यावसायिकांबरोबर त्यावर अवलंबुन असणाऱ्या प्रत्येक घटकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यंदा मात्र करोनाचे निर्बंध नसल्याने दिवाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले अलिबागकडे वळल्याने अलिबाग तालुक्यातील सर्वच पर्यटन स्थळे गजबजू लागली आहेत. त्यामुळे या व्यवसायवर जगणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

रायगड जिल्ह्याची राजधानी म्हणून अलिबागकडे पाहिले जाते. पूर्वी समुद्रकिनारी वसलेले एक छोटसे आणि नारळी – फोफळींच्या गर्दझाडीत दडलेले असे ‘अलिबाग’ हे गाव होते; परंतू या अलिबागचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षात बदलून गेला आहे. अलिबाग शहरासह तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असतानाच दुसरीकडे सारळ, रेवस बंदर, मांडवा बंदर, सासवणे, आवास, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल, रेवदंडा येथील समुद्रकिनारेही पर्यटकांनी गजबजू लागली आहेत. पर्यटकांच्या वाढत्या ओघाने येथील लॉजिंग-बोर्डींग, रिसॉर्ट, फार्म हाऊसेस, मोठाली हॉटेल्स, अलिबागचे मासळी मार्केट, भाजी मार्केट, घरगुती खाद्यपदार्थ, घरगुती खाणावळ, रिक्षा-चालक- मालक, टॅक्सी चालक-मालक, समुद्रकिनाऱ्यांवर विविधप्रकारचा व्यवसाय करणारे घोडागाडीवाले, बोटींग, भेलपुरीवाले, घोडेवाले, विक्रेते, लाँच मालकांना यामुळे चांगले सुगीचे दिवस आले आहेत.

कोरोना लॉकडाऊन काळात अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील बहुतांशी व्यवसायिकांना मोठा फटका बसला होता. अनेकांनी कर्ज घेऊन आपापले व्यवसाय सुरू केले होते; परंतू हा व्यवसायच ठप्प झाल्याने बँकेसह पतसंस्थांचे कर्ज कसे फेडायचे, तसेच कुटुंबाचे पोट कसे भरायचे असा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा ठाकला होता. लॉकडाऊननंतर अलिबाग तालुक्यातील पर्यटनस्थळे मागच्यावर्षी १५ ऑगस्टपासून खुली झाली होती. तरीही कोरोनाच्या भीतीने अलिबाग समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत नसल्याने त्यांच्या धंद्यावर अधिक परिणाम होताना दिसत होता. पण दिवाळीनिमित्त या व्यवसायिकांना अच्छे दिन बघायला मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज आल्याचे दिसून आले.

सागरीमार्गाने अलिबाग हे मुंबईला जवळ असल्याने गेटवे ते मांडवा, भाऊचा धक्का ते रेवस बंदर या दरम्यान प्रवाशी वाहतूक करणाऱ्या लाँच सेवा भरभरून येत-जात असतात. पावसाळा वगळता उर्वरित काळात पर्यटकांचा अधिक ओघ अलिबाग तालुक्यात एक दिवसीय पर्यटनासाठी असतो. तसेच या दिवाळीत जोडून लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्याने मोठ्यासंख्येने पर्यटक अलिबागमध्ये दाखल झाल्याने शहरातील सर्वच रस्ते गजबजून गेल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे अलिबाग समुद्रकिनाऱ्यालगत असलेले क्रीडा भुवनचे मैदानही वाहनांच्या पार्किंगमुळे भरून गेल्याचे दिसून आले. याशिवाय राहण्याची ठिकाणेही सध्या हाऊसफुल्ल झालेली असून, व्हेज-नॉनव्हेजची हॉटेल दुपार आणि रात्रीच्या जेवणाच्या काळात खचाखच भरलेली दिसून येत आहेत. काहींना उपहारगृहांमध्ये जेवणासाठी जागाच मिळत नसल्याने काही पर्यटक हातगाडीवरील खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे अलिबाग शहरात येणारे बरेचसे पर्यटक वॉटरस्पोर्टसचा अधिकतेने आनंद घेताना दिसून येत होते.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago