जांब समर्थ मूर्ती चोर दोन महिन्यांनी सापडले!

  191

जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील ऐतिहासिक राम, लक्ष्मण, सीता मूर्ती चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले आहे.


जांब समर्थ गावातील रामदास स्वामी यांच्या पूर्वजांनी पंच धातूच्या शेकडो वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक श्रीराम, लक्ष्मण, सीता अशा एकूण नऊ मूर्ती दोन महिन्यांपूर्वी चोरी गेल्या होत्या. ही चोरी उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले होते. हा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला होता. शिवाय तामिळनाडू सीआयडीची या तपास कमी मदत घेण्यात आली होती.


मात्र पोलिसांना या प्रकरणात काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या चोरी प्रकरणी माहिती देणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस ही जाहीर केले होते. अखेर दोन महिन्याच्या कालावधीनंतर या मूर्ती चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.


या मूर्ती चोरी प्रकरणातील दोन संशयितांसंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेला पक्की खबर मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कर्नाटक राज्यातून या मुर्ती चोरी प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या चोरट्यांची नावे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेले नाही.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी