मुंबई : काचेच्या बाटलीत फटाके फोडू नका असे सांगितले, म्हणून तीन अल्पवयीन मुलांनी एका २१ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. गोवंडी येथील शिवाजीनगर भागात सोमवारी दुपारी ही घटना घडली. या हत्येने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुनील शंकर नायडू असे मृत तरुणाचे नाव आहे. गोवंडी शिवाजीनगर भागात म्हाडा कॉलनीमध्ये सुनील राहात होता. काल दुपारी त्यांच्या इमारतीमधील एक बारा वर्षाचा मुलगा इमारतीबाहेर फटाके फोडत होता. त्याने एका काचेच्या बाटलीमध्ये फटाके फोडले. हे पाहून त्याला सुनील ओरडला काच उडून सर्वांना लागेल असे सांगून त्याने त्या मुलाला मनाई केली. याचा राग डोक्यात ठेवून या मुलाने त्याचा १५ वर्षीय भाऊ आणि १४ वर्षीय मित्राला हे सांगितले. या तिघांनी सुनीलला इमारतीजवळ गाठले. तिथे त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर १५ वर्षीय मुलाने त्याच्या मानेत चाकू खुपसला.
चाकू मारल्यानंतर सुनील या तिघांच्या मागे पळाला. त्यानंतर सुनील तीन मजले इमारती धावत मागे गेला. मात्र परत येताना जिन्यात कोसळला. ही सगळी घटना इमारतीमधील आणि आजूबाजूच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. स्थानिक नागरिकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि यातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून अन्य एकाचा शोध सुरू आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…