मुंबई : बेस्टच्या सांताक्रुझ आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी संप पुकारला होता. याच पद्धतीने आता जोगेश्वरी येथील मजास आगार, धारावी आगार, प्रतीक्षा नगर आगार या डेपोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
बेस्टच्या नियमित कर्मचाऱ्यांसारखा बोनस, पगारवाढ मिळावी ही कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. बस प्रवास व अन्य सुविधा आम्हाला का मिळत नाहीत, अशा अनेक मागण्यांसाठी बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. जोगेश्वरीतील मजास आगारातील जवळपास ३०० कंत्राटी कर्मचारी संपावर गेले असून या संपाचा परिणाम आता पश्चिम उपनगरात पहायला मिळत आहे.
प्रशासनाने या बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला तरीही हे कंत्राटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. आम्हाला आमच्या ट्रेनिंग कालावधीमध्ये २३ हजार ५०० पगार देणार असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात एवढा पगार मिळत नाही. अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास कमी व्हावा, पगारवाढ, जॉयनिंग लेटर या मागण्या करण्यात आल्या आहेत. बेस्टच्या वाहक म्हणजेच कंडक्टरला १८ हजार ५०० रुपये पगार सांगितले होते. मात्र त्यांना प्रत्यक्षात फक्त १२ हजार ६०० रुपये पगार दिला जातो. नोकरी देताना सहा तास काम करायचे सांगितले होते मात्र काम आठ तासांहून अधिक काम होते. त्याचा ओव्हर टाइमही मिळत नाही. अशा अनेक तक्रारी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या होत नाहीत तसेच या मागण्या मान्य केल्याचे लिखित पत्र दिले जात नाही तोपर्यंत कंत्राटी कर्मचारी हे आंदोलन सुरू ठेवणार आहेत, असे एका कर्मचाऱ्याने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…