सलमान खानला डेंग्यू!

  112

मुंबई : सलमान खानला डेंग्यू झाल्याने बिग बॉस-१६ या शोचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे. सलमान पुढची काही आठवडे हा शो होस्ट करू शकणार नाही. सलमान पूर्ण बरा होईपर्यंत त्याच्या जागी करण जोहर बिग बॉस १६ चे काही भाग होस्ट करेल. कलर्स टीव्हीने करण जोहरचा टिझरही रिलीज केला आहे.


याआधी शुक्रवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सलमान खान दिसला नाही. या सीझनचा वीकेंड का वार या भागाची होस्टिंग सलमान खान करतो. तो भाग शुक्रवार आणि शनिवारी प्रसारित केला जातो. मात्र यावेळी शुक्रवारी प्रसारित झालेल्या नव्या एपिसोडमध्ये सर्वजण सलमानची वाट पाहत होते, परंतु तो शोमध्ये आलाच नाही. त्यामुळे अनेक प्रश्नांना उधाण आले होते. त्यावर समोर आलेल्या माहितीनुसार, सलमानची गेल्या काही दिवसांपासून तब्येत खराब झाली होती. आता तपासणी केल्यानंतर त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आता काही दिवस तो हा शो होस्ट करणार नसून आता त्यांच्या जागी करण जोहर हा शो होस्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


यापूर्वीही करणने बिग बॉसच्या ओटीटीवरील पहिला सीझन होस्ट केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सलमान २५ ऑक्टोबर पासून पुन्हा बिग बॉसच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल