सिडको घनकचरा प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे नदी आणि शेती झाली दूषित

नवीन पनवेल : तळोजा घोट येथील सिडको घनकचरा प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूची शेती दूषित झाली आहे. याप्रकरणी गावदेवी सामाजिक संस्था, घोट यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र तक्रार करून देखील याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोप गावदेवी सामाजिक संस्थेने केला आहे.


तळोजा स्थित सिडको घनकचरा प्रकल्प आणि कचरा विलगीकरण प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सिडको घनकचरा प्रकल्पाचे दूषित पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट प्रकल्प बाहेर असलेल्या शेतीमध्ये आणि नदीमध्ये सोडण्यात येत असल्याचा आरोप या संस्थेने केला आहे.


दूषित पाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूला असलेली शेती मोठ्या प्रमाणात दूषित झाली आहे. नुकतेच घोट नदी आणि जवळ असलेल्या शेततळ्यातील मासे या प्रकल्पाच्या दूषित पाण्यामुळे मरण पावले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती. घोट नदीच्या पात्रातून दूषित पाणी पेंधर आणि तळोजा फेस टू मधील नवीन वसाहतीच्या बाजूने वाहते. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेलापूर येथे देण्यात आली, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रार करून देखील प्रदूषण मंडळ कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग