सिडको घनकचरा प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे नदी आणि शेती झाली दूषित

  144

नवीन पनवेल : तळोजा घोट येथील सिडको घनकचरा प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूची शेती दूषित झाली आहे. याप्रकरणी गावदेवी सामाजिक संस्था, घोट यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र तक्रार करून देखील याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोप गावदेवी सामाजिक संस्थेने केला आहे.


तळोजा स्थित सिडको घनकचरा प्रकल्प आणि कचरा विलगीकरण प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सिडको घनकचरा प्रकल्पाचे दूषित पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट प्रकल्प बाहेर असलेल्या शेतीमध्ये आणि नदीमध्ये सोडण्यात येत असल्याचा आरोप या संस्थेने केला आहे.


दूषित पाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूला असलेली शेती मोठ्या प्रमाणात दूषित झाली आहे. नुकतेच घोट नदी आणि जवळ असलेल्या शेततळ्यातील मासे या प्रकल्पाच्या दूषित पाण्यामुळे मरण पावले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती. घोट नदीच्या पात्रातून दूषित पाणी पेंधर आणि तळोजा फेस टू मधील नवीन वसाहतीच्या बाजूने वाहते. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बेलापूर येथे देण्यात आली, मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. तक्रार करून देखील प्रदूषण मंडळ कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

Comments
Add Comment

अलिबाग-वडखळ मार्ग; आज-उद्या जड वाहनांची वाहतूक बंद

अलिबाग : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि

मुंबई गोवा महामार्गावरील माणगावसह इंदापूर बायपासचे काम तातडीने सुरू होणार

खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन माणगाव : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम

माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये

अखेर मुरुड आगारात पाच नवीन लालपरी दाखल

नांदगाव मुरुड : मुरुड या पर्यटन स्थळी एस टी आगारात जीर्ण झालेल्या बसेस मुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र

एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर