मुलुंडमध्ये शोभेच्या झाडांची रांगोळी

मुंबई (वार्ताहर) : दिवळीनिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने चक्क झाडांच्या रांगोळीचा वेगळा प्रयोग केला आहे. मुलुंड येथील स्वामी समर्थ मनोरंजन उद्यानात शोभेकरिता झाडापासून रांगोळी साकारण्यात आली आहे.


दरम्यान, मुलुंड टोल नाक्याजवळ पालिकेचे स्वामी समर्थ मनोरंजन उद्यान आहे. हे उद्यान काही दिवसांपूर्वी सुशोभित करण्यात आले आहे, उद्यानात जॉगिंग ट्रॅक व विविध प्रकारची झाडे, फूल झाडे लावण्यात आली आहेत. यात अल्टरनेंथरा, ड्यूरांटा, जट्रोफा, अलमेंडा, अकेलिफा, कर्दळ, शंकासूर, सिंगोनियम, बांबू, तामण, पाम, लिली अशा १२ ते १५ प्रकारच्या विविध झाडांचा समावेश आहे. याच सोबत शोभेच्या झाडांपासून येथे आकर्षक रांगोळी साकारण्यात आली आहे.


स्वामी समर्थ मनोरंजन उद्यान मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असून हे उद्यान ६४८२ स्क्वेअर मीटरचे आहे. मुलुंड पूर्वेला टोल नाक्याजवळ हे मनोरंजन उद्यान आहे. उद्यानात १२ ते १५ प्रकारची विविध झाडे, बसण्याची व्यवस्था आणि चालण्यासाठी ट्रॅक बनविण्यात आला आहे. मात्र आता दिवाळीत आकर्षण म्हणून फूल आणि झाडांची रांगोळी बनवली असून अनके जण ते पाहायला गर्दी देखील करत आहेत. पावसाळ्यानंतर लँड स्केप डिजाईन करून सुमारे ३०० उद्यानात अशी संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना