बाबांचा आंबोली गावी मुक्काम

  141

समर्थ राऊळ महाराज


आबांची भ्रमंती सगळीकडे सुरूच होती. एका ठिकाणाहून पिंगुळीला आले की, लगेच दुसऱ्या गावची फेरी करत असत. एका ठिकाणी महाराज कधीच राहिले नाहीत. आंबोली गावी महाराजांनी मुक्काम केला. महाराज सावंतवाडीला गेले. त्यांच्या मनाची जशी लहर लागेल तसे ते आपला मोर्चा वळवित. सावंतवाडीला गेल्यानंतर ते अचानक दाणोलीला साटमच्या घरी जायचे. व तेथून आंबोली गावच्या प्रवासाला निघत. आंबोलीला गेले की तेथे मंगेशच्या बहिणीकडे ८/८ दिवस मुक्कामाला राहायचे. त्याचप्रमाणे आनंद वेंगुर्लेकर नावाच्या भक्ताकडे राहत. आनंदाच्या रिक्षेमधून बाबांनी खूप प्रवास केला आहे.


लहर लागली तर महाराज आंबोलीहूनच नरसोबाच्या वाडीला जायचे. तेथून परत पिंगुळीला गाडीने परतायचे आणि जर एखादे वेळेस ते क्रोधीत अवस्थेत असले, तर मग सर्वांना शिव्यांची लाखोली द्यायचे; परंतु बहुतकरून ते फिरतीवर असल्यानंतर महाराज कुठे असतील व कुठे जातील याचा थांगपत्ता कुणालाही लागत नसे. असे हे त्रिभुवन संचारी बाबा होते.

Comments
Add Comment

देवर्षी नारद

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी विणेच्या मंजुळ तालावर “नारायण... नारायण” असा नाम जप करीत त्रैलोक्यात अनिरुद्ध

जाणिले ज्याने आयुष्याचे मर्म

मनाचा गाभारा : अर्चना सरोदेया क्षणभंगुर आयुष्य म्हणजे, जणू अळवावरचे पाणी!! क्षणांत भासे

देवाकरिता स्वतःला विसरावे

अध्यात्म ब्रह्मचैतन्य : श्री गोंदवलेकर महाराज तुम्ही स्वत:ला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण

सद्गुरू का हवे?

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आज अध्यात्माच्या विरोधात काही विशिष्ट प्रवृत्ती निर्माण झालेल्या आहेत. देव

प्रयत्नांच्या सावल्यांत हरवत गेलेले रंग

ऋतुराज : ऋतुजा केळकर “काष्ठादग्निर्जायते मथ्यमानाद्भूमिस्तोयं खन्यमाना ददाति। सोत्साहानां नास्त्यसाध्यं

सोमवारी सोमप्रदोष शिवरात्री,पितृदोषातून मुक्त होण्यासाठी करा हे उपाय

सोमवार २७ जानेवारी २०२५ रोजी पौषातील सोमप्रदोष शिवरात्री आहे. या दिवशी मनापासून निवडक उपाय केल्यास पितृदोषातून