मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात साजरी होणार ‘स्वरदीपावली’

ठाणे (प्रतिनिधी) : दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दर वर्षीप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकर नागरिकांसाठी "स्वरदीपावली" हा संगीतमय कार्यक्रम २२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री ठाणेकरांच्या भेटीस आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तथा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.


दर वर्षी ठाणेकरांसाठी दीपावलीनिमित्त संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाची दिवाळी ही ठाणेकरांसाठी विशेष आनंददायी आहे कारण, ठाण्याचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सर्वच सण जल्लोषात साजरा करण्याची संधी संपूर्ण महाराष्ट्राला दिली. दिवाळीसुद्धा सर्वत्र उत्साहात साजरी होणार आहे. याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील कोपरी येथील अष्टविनायक चौक येथे शनिवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वरदीपावली हा संगीतमय कार्यक्रम ठाणेकरांसाठी आयोजित केला आहे.


सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीश राजे, प्रकाश कोटवानी, माजी नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, प्रमोद बनसोडे, सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख विशेष मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना नवीन व जुन्या मराठी गाण्यांचा आस्वाद घेता येणार आहे. हा स्वरदीपावली कार्यकम बहारदार करण्यासाठी अभिनेते अंशुमन विचारे, मानसी नाईक, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना, कविता राम, प्रसेनजीत कोसंबी, अक्षता सावंत, जगदीश पाटील, तेजा देवकर, सुकन्या काळण, हेमलता बाणे आदी नामवंत गायक-अभिनेते सहभागी होणार आहेत.


दीपावली म्हणजे उत्सव दिव्यांचा, मांगल्याचा, मनामनातील अंधार दूर करून नव्या उमेदीने उभे राहण्याच्या या सणांचा द्विगुणित करण्यासाठी सर्व ठाणेकरांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे.

Comments
Add Comment

एसी ऑफिस सोडून मातीच्या गोण्या उचलल्या!

मोखाडा गटविकास अधिकाऱ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान मोखाडा : सरकारी योजना केवळ कागदावर किंवा आदेशापुरत्या

तलावपाळीवर नववर्षाचे स्वागत गंगा आरतीने !

३१ डिसेंबरच्या रात्री कार्यक्रम; वाराणसीहून पंडितांना आमंत्रण ठाणे : ठाणे शहर येत्या नवीन वर्षाच्या

ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

भाजपची ५० जागांची मागणी ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप

अंबरनाथमध्ये २०८ बोगस मतदार !

भाजपचा शिवसेनेच्या शिंदे गटावर आरोप, पोलीस चौकशी सुरू अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान खळबळजनक

Mira-Bhayandar Leopard Attack : होणाऱ्या नवरीवर बिबट्याची झडप: चेहऱ्यावर गंभीर जखमा अन्…नेमकं काय घडलं त्या घरात? मीरा भाईंदर हादरलं!

मीरा भाईंदर : पुणे आणि नागपूरनंतर आता मुंबईलगतच्या मीरा भाईंदर शहरात बिबट्याच्या वावराने मोठी खळबळ उडाली आहे.

पुलाच्या कामामुळे कल्याणमध्ये वाहतूक मार्गात २० दिवस बदल , वालधुनी उड्डाणपुलावर काम सुरू

कल्याण : कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ