'आरबीआय'ची दोन सहकारी बँकांवर कारवाई

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये खाती असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये पुण्यातील राजगुरूनगर सहकारी बँक आणि गुजरातमधील को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोट यांचा समावेश आहे. राजगुरूनगर सहकारी बँकेला चार लाख रुपये आणि को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटला २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


रिझर्व्ह बँकेकडून या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार राजगुरू सहकारी बँकेला व्याजदर आणि डिपॉझिटसंबंधी केंद्रीय बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी पकडण्यात आले आहे. तर को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटने जागरुकता योजनेसंबंधी नियमांची अवहेलना करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय बँकेने हे पाऊल उचलले आहे.


आरबीआयने या बँकांची तपास करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल समोर आल्यावर राजगुरूनगर सहकारी बँकेने मृत खातेधारकांच्या चालू खात्यामध्ये असलेली रक्कम त्यांच्या वारसांना सोपवली नव्हती. असा परिस्थिती वारसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आरबीआयने बँकेला याआधी नोटीस पाठवली होती. मात्र लेखी जबाबाने आरबीआयचे समाधान झाले नाही, तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने दंडात्मक कारवाई केली.


आरबीआयने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा दंड बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम ५६, कलम ४६(४) आणि कलम ४७ए(१) (सी) अंतर्गत दोषी आढळल्याने ठोठावण्यात आला आहे. मात्र याबाबत आरबीआयने सांगितले की, यातील कुठल्याही देवाणघेवाणीचा ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नाही.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बसमध्ये तरुणीचा विनयभंग! आधी मांडीवरून हात फिरवला, मग टीशर्टमध्ये हात घातला अन्...संतापजनक व्हिडिओ व्हायरल

केरळ : महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना केरळ

Google Maps new features : हँड्स-फ्री ड्रायव्हिंग! जेमिनी AI सह गुगल मॅप्समध्ये १० नवीन फीचर्स; काय आहे खास? जाणून घ्या

नवी दिल्ली : तुमच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलण्यासाठी, गुगलने मॅप्समध्ये जेमिनी AI सह तब्बल १० नवीन

वंदे मातरम् इतिहास नाही; देशाच्या अस्तित्वाची ओळख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘वंदे मातरम् हे शब्द आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतात. आपल्याला हे शब्द बळ

शैक्षणिक संस्था, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलात भटक्या कुत्र्यांना ‘नो एण्ट्री’

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश नवी दिल्ली : शैक्षणिक संस्था, बस-रेल्वे

तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीचे 'एटीसी' कोलमडले! दिल्लीच्या एटीसी बिघाडाचा फटका मुंबईला!

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी एअर ट्रॅफिक

PM Modi : बिहारला नको 'कट्टा सरकार'! पंतप्रधान मोदींचा महाआघाडीवर 'दुतोंडी, गुंड' म्हणत जोरदार हल्लाबोल

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी औरंगाबाद येथील एका