'आरबीआय'ची दोन सहकारी बँकांवर कारवाई

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये खाती असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये पुण्यातील राजगुरूनगर सहकारी बँक आणि गुजरातमधील को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोट यांचा समावेश आहे. राजगुरूनगर सहकारी बँकेला चार लाख रुपये आणि को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटला २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


रिझर्व्ह बँकेकडून या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार राजगुरू सहकारी बँकेला व्याजदर आणि डिपॉझिटसंबंधी केंद्रीय बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी पकडण्यात आले आहे. तर को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटने जागरुकता योजनेसंबंधी नियमांची अवहेलना करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय बँकेने हे पाऊल उचलले आहे.


आरबीआयने या बँकांची तपास करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल समोर आल्यावर राजगुरूनगर सहकारी बँकेने मृत खातेधारकांच्या चालू खात्यामध्ये असलेली रक्कम त्यांच्या वारसांना सोपवली नव्हती. असा परिस्थिती वारसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आरबीआयने बँकेला याआधी नोटीस पाठवली होती. मात्र लेखी जबाबाने आरबीआयचे समाधान झाले नाही, तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने दंडात्मक कारवाई केली.


आरबीआयने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा दंड बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम ५६, कलम ४६(४) आणि कलम ४७ए(१) (सी) अंतर्गत दोषी आढळल्याने ठोठावण्यात आला आहे. मात्र याबाबत आरबीआयने सांगितले की, यातील कुठल्याही देवाणघेवाणीचा ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नाही.

Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज