मुंबई : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे त्याच्या आधीच कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे.
यंदा दिवाळी ही २२ तारखेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच म्हणजेच २१ तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात यावेत असा आदेश सर्व आस्थापनांना देण्यात आला आहे. अशा प्रकारची मागणी या आधी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षण संस्था, महाविद्यालय आणि इतर सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे.