जळगाव ते मनमाड चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव ते मनमाड या १६० किमी लांबीच्या चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून या बाबतचे पत्र भुसावळ विभागाला प्राप्त झाले आहे. या मंजुरीमुळे सर्वेक्षणाची निविदा लवकरच काढण्यात येईल.


मध्य रेल्वेच्या जळगाव ते मनमाड अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर दर दहा मिनिटांनी गाडया धावत असतात. अत्यंत व्यस्त असलेल्या या मार्गावर एखादा अपघात झाल्यास त्याचा वाहतुकीवर परिणाम होउुन वाहतूक ही विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या उभारणीचा प्रस्ताव भुसावळ विभागाने रेल्वे मंत्रायलाकडे पाठवला होता.


दरम्यान, जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून काम देखील सुरू झाले असून पाचोरा पर्यंत काम पूर्ण होत आले आहे. तसेच मनमाड कडून १७ किमी लांबीचा मार्ग टाकला गेल्याचे सांगण्यात येते. आता चौथ्या मार्गाच्या सर्वेक्षणाला परवानगी मिळाली आहे. या सर्वेक्षणासाठी दोन कोटींचा निधी देखील मंजूर केला गेला आहे. चारही मार्ग झाल्यानंतर जळगाव मनमाड दरम्यान विलंबाने गाडया धावण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच मेगाब्लॉकमुळे रुदृ होणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

वर्धा शहरातील रामनगर येथील भूखंड मालकी हक्काने देण्यास मंजुरी

मुंबई : वर्धा नगरपरिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने करून

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

मुंबई : शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी

मच्छिमारांना कर्जावर चार टक्के व्याज सवलत

मुंबई : राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादकांसह किसान क्रेडिट कार्डधारक मत्स्यव्यावसायिकांना २

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा

मुंबई : सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)

नागपूरच्या लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठास सात कोटी रुपयांचा निधी

मुंबई : नागपूर येथील लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस जीव रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र

Breaking News : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला होणार मतदान

राज्यात आचारसंहिता लागू २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतींसाठी होणार मतदान २ डिसेंबरला मतदान, ३