जळगाव ते मनमाड चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव ते मनमाड या १६० किमी लांबीच्या चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून या बाबतचे पत्र भुसावळ विभागाला प्राप्त झाले आहे. या मंजुरीमुळे सर्वेक्षणाची निविदा लवकरच काढण्यात येईल.


मध्य रेल्वेच्या जळगाव ते मनमाड अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर दर दहा मिनिटांनी गाडया धावत असतात. अत्यंत व्यस्त असलेल्या या मार्गावर एखादा अपघात झाल्यास त्याचा वाहतुकीवर परिणाम होउुन वाहतूक ही विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या उभारणीचा प्रस्ताव भुसावळ विभागाने रेल्वे मंत्रायलाकडे पाठवला होता.


दरम्यान, जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून काम देखील सुरू झाले असून पाचोरा पर्यंत काम पूर्ण होत आले आहे. तसेच मनमाड कडून १७ किमी लांबीचा मार्ग टाकला गेल्याचे सांगण्यात येते. आता चौथ्या मार्गाच्या सर्वेक्षणाला परवानगी मिळाली आहे. या सर्वेक्षणासाठी दोन कोटींचा निधी देखील मंजूर केला गेला आहे. चारही मार्ग झाल्यानंतर जळगाव मनमाड दरम्यान विलंबाने गाडया धावण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच मेगाब्लॉकमुळे रुदृ होणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत