जळगाव ते मनमाड चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी

  87

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव ते मनमाड या १६० किमी लांबीच्या चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून या बाबतचे पत्र भुसावळ विभागाला प्राप्त झाले आहे. या मंजुरीमुळे सर्वेक्षणाची निविदा लवकरच काढण्यात येईल.


मध्य रेल्वेच्या जळगाव ते मनमाड अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर दर दहा मिनिटांनी गाडया धावत असतात. अत्यंत व्यस्त असलेल्या या मार्गावर एखादा अपघात झाल्यास त्याचा वाहतुकीवर परिणाम होउुन वाहतूक ही विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या उभारणीचा प्रस्ताव भुसावळ विभागाने रेल्वे मंत्रायलाकडे पाठवला होता.


दरम्यान, जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून काम देखील सुरू झाले असून पाचोरा पर्यंत काम पूर्ण होत आले आहे. तसेच मनमाड कडून १७ किमी लांबीचा मार्ग टाकला गेल्याचे सांगण्यात येते. आता चौथ्या मार्गाच्या सर्वेक्षणाला परवानगी मिळाली आहे. या सर्वेक्षणासाठी दोन कोटींचा निधी देखील मंजूर केला गेला आहे. चारही मार्ग झाल्यानंतर जळगाव मनमाड दरम्यान विलंबाने गाडया धावण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच मेगाब्लॉकमुळे रुदृ होणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील