जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव ते मनमाड या १६० किमी लांबीच्या चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून या बाबतचे पत्र भुसावळ विभागाला प्राप्त झाले आहे. या मंजुरीमुळे सर्वेक्षणाची निविदा लवकरच काढण्यात येईल.
मध्य रेल्वेच्या जळगाव ते मनमाड अप आणि डाऊन रेल्वे मार्गावर दर दहा मिनिटांनी गाडया धावत असतात. अत्यंत व्यस्त असलेल्या या मार्गावर एखादा अपघात झाल्यास त्याचा वाहतुकीवर परिणाम होउुन वाहतूक ही विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या उभारणीचा प्रस्ताव भुसावळ विभागाने रेल्वे मंत्रायलाकडे पाठवला होता.
दरम्यान, जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून काम देखील सुरू झाले असून पाचोरा पर्यंत काम पूर्ण होत आले आहे. तसेच मनमाड कडून १७ किमी लांबीचा मार्ग टाकला गेल्याचे सांगण्यात येते. आता चौथ्या मार्गाच्या सर्वेक्षणाला परवानगी मिळाली आहे. या सर्वेक्षणासाठी दोन कोटींचा निधी देखील मंजूर केला गेला आहे. चारही मार्ग झाल्यानंतर जळगाव मनमाड दरम्यान विलंबाने गाडया धावण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच मेगाब्लॉकमुळे रुदृ होणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…