मुंबई : मंबई-गोवा या महामार्गावर रस्त्याला वैतागलेल्या कोकणवासियांनी आज रास्ता रोको आंदोलन केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अडवून पेणकरांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.
कामाला दिरंगाई करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. ‘माझे पेण’ या सामाजिक संस्थेच्या वतीने संघटनेच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात पेण तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे.
कोकण आणि रायगडवासियांची थट्टा थांबवून, १८ हजार बळी घेणाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. शिवाय हा रस्ता सिमेंटचा करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या आंदोलनामध्ये यमराजाच्या ‘अवतारा’मध्ये आंदोलक सहभागी झाले होते.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…