सावधान! डोळ्यांची साथ पसरलीय

  189

मुंबई (वार्ताहर) : मुंबईत डोळ्यांची साथ आली असून पालिकेने ने मुंबईकरांना लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. डोळ्यांतून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतो. दरम्यान डोळ्यांच्या या साथीमुळे पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कोरोना, पावसाळी साथीचे आजार आता नियंत्रणात येत असताना डोळ्यांच्या साथीने डोके वर काढले आहे. डोळ्यांतून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांनी बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांकडून मुंबईकरांना देण्यात येत आहे. तसेच या साथीचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णांनी घरी बसून आराम करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


गेल्या आठवड्यापासून मुंबईत डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते, अशीच काहीशी लक्षणे मुंबईकरांमध्ये दिसून येत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असे आवाहन रुग्णांना तज्ज्ञांकडून केले जात आहे. डोळे येण्याचा संसर्ग सर्वात आधी एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही त्याचा संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की, पुन्हा त्याच व्यक्तीला याचा संसर्ग होत नाही, असे अनेकांना वाटते म्हणून अनेकजण निष्काळजीपणा करतात. पण असे नाही, एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतरही पुन्हा त्याच व्यक्तीला संसर्ग होऊन डोळे येऊ शकतात, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

Comments
Add Comment

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा