मुलीला फरफटत नेणारा ठाण्यातील मुजोर रिक्षावाला गजाआड

  114

ठाणे : ठाण्यात मुलीला फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपी रिक्षाचालकाने दिली आहे. काल सकाळी ७ वाजता एक विद्यार्थिनी बाजारपेठेत पायी जात असताना रिश्रा चालकाने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. मुलीने त्याला जाब विचारल्यानंतर रिक्षाचालकाने तिचा हात पकडून फरफटत नेले. त्यानं तरुणीला फरफटत काही अंतर पुढे नेले. तरुणीच्या हाताला दुखापत झाल्याने ती रस्त्यात पडली. त्यानंतर रिक्षाचालक स्थानकाच्या दिशेने फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर दिघा भागात राहणाऱ्या या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी रिक्षाचालक कटिकादाला उर्फ राजू आब्बायी विरांगनेलू हा मूळचा आंध्र प्रदेशातला आहे.


दरम्यान, या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले त्या परिसरात होते. संपूर्ण प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांशी पाठपुरावा करून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा केले. त्यानंतर या तरुणीसोबत ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचा नंबर मिळवला आणि रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. अखेर तब्बल २४ तासांनी मुजोर रिक्षाचालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Comments
Add Comment

रामायण: द इंट्रोडक्शन सिनेमा बॉक्स ऑफिसवर मैलाचा दगड ठरणार का?... नऊ शहरांचं उद्या पहिल्या लूककडे लक्ष..

रामायण हे आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत अतिशय महत्वाच मानलं जात. रामायणातील विविध कथांचं वाचन आणि अध्ययन करून

वीज कोसळण्याचे अलर्ट देणारे अ‍ॅप

मुंबई : वीज कोसळून दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यावर उपाय म्हणून वीज कोसळणार असल्याची

कमी खर्चाच्या, नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी वाढवणे – कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातर्फे महाकृषी एआय धोरण कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई: मानवरहित शेती, एआय-आधारित (AI Oriented) हवामान अंदाज,

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण ठरतील !

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचे प्रतिपादन मुंबई: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष