मुरूड अंगणवाडी सेविकांनी दिला सामूहिक राजीनामा

मुरूड (वार्ताहर) : सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहचवण्याचे काम प्रामुख्याने अंगणवाडी सेविका करतात. कोरोना कालावधीत आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी काम केले होते. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गैरवर्तुणूकीमुळे अंगणावाडी सेविकांनी सामूहिकपणे बीएलओ पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले आहे.


नजीकच्या कालावधीत स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक विभागही जोरदारपणे कामाला लागले आहे. निवडणुकीच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. निवडणुकीच्या कामासंबंधी गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन मुरुड प्रशासनाकडून करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविकांना बीएलओचे काम देण्यात आले. गेल्या सात वर्षापसून ते सदर काम करत आहेत. मात्र त्यांच्या मानधनाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.


या बैठकीत मानधनाबाबत विचारले असता, नायब तहसीलदार अमित पुरी यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनाम दिला. यावेळी अमित पुरी यांनी महिलांना अपशब्द वापरले, तसेच दमदाटी केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्यती कारवाई करावी आणि महिलाना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली. दरम्यान, अमित पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, अंगणवाडी सेविकांनी नेमके निवेदनात काय म्हटले आहे हे मला माहिती नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, असे सांगितले.


अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेले निवेदन मी वाचले आहे, मात्र त्यामध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत. तसे काहीच झालेले नाही. बीएलओचे मानधन दिलेले आहे. सोमवारी अंगणवाडी सेविकांची बैठक बोलावण्यात येईल आणि त्यांचे काय प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यात येतील. -रोहन शिंदे, तहसीलदार

Comments
Add Comment

अलिबाग नगरपालिकेचा १६१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य : नगराध्यक्षा अक्षया नाईक अलिबाग : अलिबाग नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन

जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणाची जुळवाजुळ

जिल्हाधिकारी कार्यालयात १२ मार्चला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया तालुकास्तरावर ११ मार्चला सभापती,

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी