मुरूड अंगणवाडी सेविकांनी दिला सामूहिक राजीनामा

मुरूड (वार्ताहर) : सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहचवण्याचे काम प्रामुख्याने अंगणवाडी सेविका करतात. कोरोना कालावधीत आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी काम केले होते. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गैरवर्तुणूकीमुळे अंगणावाडी सेविकांनी सामूहिकपणे बीएलओ पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले आहे.


नजीकच्या कालावधीत स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक विभागही जोरदारपणे कामाला लागले आहे. निवडणुकीच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. निवडणुकीच्या कामासंबंधी गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन मुरुड प्रशासनाकडून करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविकांना बीएलओचे काम देण्यात आले. गेल्या सात वर्षापसून ते सदर काम करत आहेत. मात्र त्यांच्या मानधनाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.


या बैठकीत मानधनाबाबत विचारले असता, नायब तहसीलदार अमित पुरी यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनाम दिला. यावेळी अमित पुरी यांनी महिलांना अपशब्द वापरले, तसेच दमदाटी केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्यती कारवाई करावी आणि महिलाना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली. दरम्यान, अमित पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, अंगणवाडी सेविकांनी नेमके निवेदनात काय म्हटले आहे हे मला माहिती नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, असे सांगितले.


अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेले निवेदन मी वाचले आहे, मात्र त्यामध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत. तसे काहीच झालेले नाही. बीएलओचे मानधन दिलेले आहे. सोमवारी अंगणवाडी सेविकांची बैठक बोलावण्यात येईल आणि त्यांचे काय प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यात येतील. -रोहन शिंदे, तहसीलदार

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग