Categories: रायगड

मुरूड अंगणवाडी सेविकांनी दिला सामूहिक राजीनामा

Share

मुरूड (वार्ताहर) : सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहचवण्याचे काम प्रामुख्याने अंगणवाडी सेविका करतात. कोरोना कालावधीत आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी काम केले होते. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गैरवर्तुणूकीमुळे अंगणावाडी सेविकांनी सामूहिकपणे बीएलओ पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दिले आहे.

नजीकच्या कालावधीत स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक विभागही जोरदारपणे कामाला लागले आहे. निवडणुकीच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे. निवडणुकीच्या कामासंबंधी गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी बैठकीचे आयोजन मुरुड प्रशासनाकडून करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविकांना बीएलओचे काम देण्यात आले. गेल्या सात वर्षापसून ते सदर काम करत आहेत. मात्र त्यांच्या मानधनाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.

या बैठकीत मानधनाबाबत विचारले असता, नायब तहसीलदार अमित पुरी यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनाम दिला. यावेळी अमित पुरी यांनी महिलांना अपशब्द वापरले, तसेच दमदाटी केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्यती कारवाई करावी आणि महिलाना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली. दरम्यान, अमित पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, अंगणवाडी सेविकांनी नेमके निवेदनात काय म्हटले आहे हे मला माहिती नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही, असे सांगितले.

अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेले निवेदन मी वाचले आहे, मात्र त्यामध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत. तसे काहीच झालेले नाही. बीएलओचे मानधन दिलेले आहे. सोमवारी अंगणवाडी सेविकांची बैठक बोलावण्यात येईल आणि त्यांचे काय प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यात येतील. -रोहन शिंदे, तहसीलदार

Recent Posts

Suraj Chavan: ‘या’ दिवशी पाहता येणार,फक्त ९९ रुपयांत; सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’

मुंबई: रीलस्टार सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक‘ चित्रपट तीन दिवसांपूर्वी लोकांच्या भेटीला आला…

6 minutes ago

‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती

पुणे: पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे निर्दश सरकारने दिले…

11 minutes ago

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, मच्छीमार बांधवांना किसान कार्डचे वाटप

मुंबई : महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला…

16 minutes ago

भारताचा ‘जलप्रहार’?, झेलमच्या रौद्र पाण्याने पाकिस्तानात हाहाकार

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…

1 hour ago

Breaking News : आधार, पॅन, वाहन परवाना एकाच ठिकाणी होणार अपडेट

नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…

3 hours ago

पाकिस्तानच्या सैन्यात पसरली अस्वस्थता, लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…

3 hours ago