Attractive girl in car fastens seatbelt
मुंबई : मुंबईत आता दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीपाठोपाठ चार चाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. चार चाकी वाहनांमधून प्रवास करताना चालकासह सहप्रवाशांनी सीट बेल्ट न लावता प्रवास केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. याबाबतचे निवेदन मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.
निवदेनात मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, मोटर कार चालवणाऱ्या सर्व ड्रायव्हर्सना आणि प्रवाशांना सीटबेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटर व्हेईकल सुधारणा कायदा, २०१९ च्या १९४ ब (१) नुसार, चालकांना आणि प्रवाशी विना सीटबेल्ट शिक्षेस पात्र होऊ शकतात. ज्या वाहनांमध्ये प्रवाशांसाठी सीटबेल्टची सुविधा नाही त्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत हे सीटबेल्ट बसवून घ्यावेत. अन्यथा त्यानंतर मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) अन्वये कारवाई करण्यात येईल.
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारला महिन्याभरापूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातावेळी मिस्त्री यांनी सीट बेल्ट न लावल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तपासात ही बाब निष्पन्न झाली होती. यापार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यापुढे भारतीय वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज आणि चालकासह सर्व प्रवाशांना सीटबेल्ट लावणे बंधनकारक असल्याची घोषणा केली होती.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…