रमेश लटके हयात असते तर ते शिंदेंबरोबर असते : नारायण राणे

  88

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आज जर रमेश लटके हयात असते तर ते नक्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असते, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकच नव्हे तर येणारी मुंबई महापालिका निवडणूकही भारतीय जनता पार्टी जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतली एकही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला जिंकता येणार नाही. दक्षिण मुंबईची जागासुद्धा भाजपाच जिंकेल, असे ते म्हणाले.


आज अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे गटाकडून करण्यात आलेले शक्ती प्रदर्शन, हे शक्तिप्रदर्शन नसून, एक ना धड भाराभर चिंध्या... याचेच प्रदर्शन होते. जे कमजोर असतात तेच एकमेकांना उब देऊन आपण शक्तिशाली असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतात. सगळे एकत्र आले म्हणजे शक्ती आली, असे होत नाही असेही राणे म्हणाले. उद्धव ठाकरे आता बोलतात की हिम्मत असेल तर समोर येऊन लढा. आधी तेच म्हणत होते की आमचे सरकार पाडून दाखवा. आता पाडून दाखवले... आता निवडणुकीत पण पाडून दाखवू. मातोश्रीत बसून नुसत्या वल्गना करणे सोपे आहे. अहो जरा मातोश्रीचा दरवाजा तरी उघडा... बाहेर बघा... वारा सुटला आहे की पाऊस पडतोय ते... महाराष्ट्रावरचे बोलणे संपले. आता बोलण्यातून मुंबईपण गेली. आता यांच्या तोंडात वरळी आहे. तेही जाईल असे भाकितही त्यांनी केले. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणे यांचीही सभा होईल, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी जाहीर केले.


बनावट शपथपत्राची चौकशी सुरु


बनावट शपथपत्राची चौकशी सुरु आहे. दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. लवकरच वास्तव समोर येईल, असे नारायण राणे म्हणाले. सकाळी बाबुलनाथचे दर्शन घेऊन मी प्रचाराला सुरूवात केली आहे. मी एकच सांगतो की, दक्षिण गोवा आणि दक्षिण मुंबई माझ्याकडे आहे. मी तिकडेही जाऊन आलो आणि इकडे मुंबईतही प्रचार सुरु आहे. मी दोन्ही मतदार संघ निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता