वसई-विरारकरांचे सायबर लुटीतील ५९ लाख परत

  85

विरार (प्रतिनिधी) : सायबर गुन्हे शाखेने मागील ९ महिन्यांत विविध गुन्ह्यांतून लुटली गेलेली ५९ लाखांची रक्कम परत मिळवली आहे. सध्या स्मार्टफोनमुळे ऑनलाइन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक करणारे सायबर भामटेदेखील सक्रिय झालेले आहेत. ते विविध प्रकारे नागरिकांची फसवणूक करत असतात. विविध प्रकारचे आमिष दाखवून, योजनांमध्ये गुंतवून नागरिकांच्या खात्यातील रक्कम लंपास करण्यात येत आहे. मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे शाखेने याप्रकरणी त्वरित कारवाई करून तक्रारदार नागरिकांच्या पैसे परत मिळवून देत असते. चालू वर्षांतील १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या ९ महिन्यांत सायबर गुन्हे शाखेने तब्बल ५९ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे.


सायबर भामटे नागरिकांची फसवणूक करताना ४ मार्गानी त्यांचे पैसे खात्यातून लंपास करतात. त्यातील पहिला म्हणजे ई कॉमर्स संकेतस्थळांवर पैसे वळवले जातात. डमी ऑर्डरने ते कंपनीकडे व्यवहार करतात आणि फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे येताच ते काढून घेतात. यामुळे ते कधी पकडले जात नाहीत. दुसऱ्या प्रकारात पेमेंट गेटवेच्या माध्यमातून (उदा. गूगल पे, फोन पे, पेटीएम) पैसे वळवले जातात. तिसऱ्या प्रकारात मनोरंजन, खेळ (गेमिंग) च्या संकेतस्थळावरून पैसे वळविण्यात येतात. तर चौथ्या प्रकारात थेट बँकेतून काढून यूपीआयद्वारे दुसऱ्या बँक खात्यात वळवले जातात.


याबाबत माहिती देताना सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुजीत गुंजकर म्हणाले, जेव्हा वाणिज्य संकेतस्थळ, पेमेंट गेटवे आणि गेमिंग संकेतस्थळावर नागरिकांची फसवणूक करून पैसे वळवले जातात तेव्हा आम्ही तात्काळ संबंधित कंपनीला संपर्क करून व्यवहार थांबवतो आणि ते पैसे नागरिकांना परत मिळवून देत असतो. मात्र जेव्हा पैसे दुसऱ्या खात्यात जातात तेव्हा मात्र कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. त्याला विलंब लागतो.


ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाली, की नागरिक स्थानिक पोलीस ठाण्याकडे तक्रार करतात. मात्र स्थानिक पोलीस या तक्रारी घेत नाहीत किंवा सायबर कक्षाकडे जाण्याचा सल्ला देतात. पोलीस आयुक्तालयाच्या सायबर कार्यालयाबद्दल नागरिकांना फारशी माहिती नसते. शिवाय ते लांबही आहे. त्यामुळे फसवणुकीनंतर २४ तासांचा कालावधी निघून जातो आणि लुटीचे पैसे परत मिळविण्यात अडचणी येतात.


नागरिकाची कोणती दक्षता घ्यावी...




  • ऑनलाइन कर्जाचे अॅप (लोन अॅप) डाऊनलोड करण्यापूर्वी त्याच्या सत्यतेची पडताळणी करावी. कोणताही अनोळखा कॉल आल्यास क्रेडिट कार्ड आणि बँकेशी संबंधित माहिती देऊ नये. तसेच ओटीपी शेअर करू नये. क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करताना त्याची माहिती कोठेही सेव्ह करू नये.

  • क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांने व्यवहाराचे (ट्रान्झॅक्शनचे) प्रत्येक लघुसंदेश (एसएमएस) तपासावे. त्यामध्ये काही अनियमितता असल्यास तात्काळ संबंधित बँकेस व सायबर कक्षाकडे तक्रार करावी. सध्या ५ जी सेवा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. त्यासंबंधित फसवे कॉल, एसएमएस, लिंक प्राप्त झाल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये.

Comments
Add Comment

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

Legal Notice to Laxman Hake: "सात दिवसांत माफी मागा नाहीतर.." लक्ष्मण हाकेंना अजित पवारांकडून कायदेशीर नोटीस

माफी न मागितल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा बारामती: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपमुख्यमंत्री अजित

BRICS Summit 2025: ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी ब्राझीलला पोहोचले, गणेश वंदनाने झाले स्वागत

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांनी केले पंतप्रधानांचे स्वागत रिओ दि जानेरो: १७ वी

CA Exam Result: सीए परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबई-ठाण्याच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

सीए अंतिम परीक्षेत मुंबईचा 'टॉपर' मुंबई: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)कडून मे २०२५

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

College students clashes: पुण्यात भरदिवसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा, कॅम्पसमध्ये कोयते आणि हातोड्याने हल्ले

पुणे: शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यातच विद्यार्थ्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. एका नामांकित