Categories: क्रीडा

इनडोअर क्रिकेट विश्वचषकात भारताचा श्रीलंकेवर १२ धावांनी विजय

Share

सिडनी (वृत्तसंस्था) : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोअर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बुधवारी भारताने श्रीलंकेवर १२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने फलंदाजी करताना १६ षटकांत १०५ धावा केल्या, तर श्रीलंकेने ९३ धावा करताना जोरदार लढत दिली.

१६ षटकांच्या सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या चारही जोड्यांनी अनुक्रमे २१, २४, २३ व ३८ धावा करत एकूण १०५ धावा करत मजबूत स्थिती मिळवली. भारताच्या शेवटच्या जोडीनेही जोरदार फटकेबाजी करत भारताला शंभरी पार करून दिली. तर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या चारही जोड्यांना अनुक्रमे २१, २५, ३१ व १६ धावांवर रोखले. श्रीलंकेने भारताला जोरदार लढत दिली, मात्र भारताने १२ धावांनी विजय साजरा केला.

भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकांत श्रीलंकेच्या एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने श्रीलंकेच्या धावाफलकातून २५ धावा कमी करता आल्या. तर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही १६ षटकांत भारताच्या एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने भारताच्या धावाफलकातून सुध्दा २५ धावा कमी झाल्या. एकूणच भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय चांगले झाले. त्यामुळेच कडव्या प्रतिकारानंतर सुध्दा भारताला विजय प्राप्त करता आला. विशेष म्हणजे शेवटच्या जोडीने केलेल्या फटकेबाजीनेच भारताचा विजय सुकर झाला.

भारतातर्फे पहिल्या जोडीने धनुश भास्कर (८) व दैविक राय (१३) यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर दुसऱ्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (१२) व अफ्रोज पाशा (१२), तिसऱ्या जोडीतील सूरज रेड्डी (१६) व अरिज अजीज (६) व चौथ्या व शेवटच्या जोडीतील नामशीद व्हि. (१३) व मोहसिन नादाम्मल (२५) यांनी भारतासाठी जोरदार कामगिरीची नोंद केली.

श्रीलंकेच्या पहिल्या जोडीमधील निलंथा वीजेकून (१९) व एंडी सोलोमोंस (२), दुसऱ्या जोडीमधील रुमेश पेरेरा (१०) व चंडिमा अबेकूण (१५), तिसऱ्या जोडीतील कोलिथा हापूयाराच्ची (१०), व मालशान रोड्रिगो (२१), तर शेवटच्या जोडीतील निलोचना पेरेरा (९) व दासून रंदिका (७) यांनी कडवी लढत दिली.

भारताच्या नामशीद व्हि. याने २, धनुश भास्कर, अफ्रोज पाशा व सूरज रेड्डीने यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केले, तर श्रीलंकेच्या निलंथा वीजेकूनने ३ व मालशान रोड्रिगो, दासून रंदिका यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार श्रीलंकेच्या निलंथा वीजेकून याला देऊन गौरवण्यात आले.

Recent Posts

ज्यांना काश्मीरला जायचं आहे त्यांनी संपर्क साधावा, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे काश्मीरला जाण्याचे पर्यटकांना आवाहन

मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…

3 minutes ago

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

6 hours ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

6 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

6 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

7 hours ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

7 hours ago