बेस्ट वर्कर्स युनियनचे वडाळा आगारात आंदोलन

  71

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट उपक्रम अनेकदा कामगारांच्या बाबतीत उदासीन असल्याचे पाहायला मिळते, त्यातच आता तिकीट मशीन नादुरुस्त झाल्यास त्यासाठी वाहकाला जबाबदार धरून दंड वसूल करण्यात येणार आहे. बेस्ट प्रशासनाकडून याबाबतचा फतवा काढण्यात आला आहे. याचा विरोध करत कामगारांनी बेस्ट वर्कर्स युनियनच्या मार्गदर्शनाखाली वडाळा आगारात आंदोलन केले.


मुंबईकरांना कमी दरात बेस्ट चांगली सेवा देते. मात्र दुसरीकडे कामगारांच्या बाबतीत भेदभाव करत असल्याचा आरोप नेहमी बेस्टवर केला जातो. बेस्टकडून तिकीट मशीन नादुरुस्त झाल्यास त्यासाठी वाहकाला जबाबदार धरून त्याच्याकडून याचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे परिपत्रक बेस्टकडून जाहीर करण्यात आले.


यात मशीन मागील कव्हरसाठी १५८२ रुपये, बॅटरी कव्हरसाठी ११०५ रुपये, बॅटरीसाठी २२१४ रुपये, थर्मल प्रिंटरकरिता १८०३ रुपये, एलइडी कव्हरसाठी ४७३७ रुपये, मेन बोर्डसाठी ८४३८ रुपये, वायफाय अँटीना ब्रॅकेटसाठी ९६० रुपये, तर पेपर फ्लॅपकरिता ९६० रुपये अशी किंमत वसूल करण्यात येणार असल्याचे पत्रक बेस्ट प्रशासनाने काढले. त्यावर कर्मचाऱ्यांना होणाऱ्या या भूर्दंडाविरोधात बेस्ट वर्कर्स युनियनकडून आंदोलन करण्यात आले.


दरम्यान या निर्णयाविरोधात मंगळवारी केवळ निदर्शने करून आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या बैठकीत बेस्ट प्रशासनाकडे आम्ही हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली असून युनियनकडून दिवाळीपर्यंत वाट पाहण्यात येईल, अन्यथा दिवाळीनंतर आंदोलन करण्यात येईल. - शशांक राव, बेस्ट वर्कर्स युनियन अध्यक्ष
Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री