रायगडला परतीच्या पावसाने झोडपले; चोवीस तासात ८८.४० टक्के पावसाची नोंद

Share

अलिबाग (वार्ताहर) : रायगड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच झोडपून काढले असून, गेल्या चोवीस तासात सरासरी ८८.४० टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याकाळात अलिबाग, मुरुड, पनवेल, माणगाव, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यांसह माथेरान या हिल स्टेशन परिसरात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला भातपिकाचा घास हिरावतो की, काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पाऊस लांबल्याने शेतात तयार झालेला हळवा आणि निमगरवा भातपीक कापण्याची सध्यातरी घाई शेतकऱ्यांनी करू नये, असे सांगितले. गरवा भातपिकाला सध्या धोका नसल्याचेही कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाऱ्यासोबत पाऊस अजून काही दिवस पडत राहिल्यास हळवा आणि निमगरवा भातपीक शेतात आडवे होण्याची शक्यता आहे. तर भाताच्या लोंबीचा शेतातील पाण्याशी संपर्क आल्यास भातपिकाची नासाडी होऊ शकते, अशी भीतीही कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अलिबागमध्ये ११६ मि.मी, पेण ६२ मि.मी, मुरुड १६१ मि.मी., पनवेल १४० मि.मी., उरण १०० मि.मी., कर्जत ५६.२० मि.मी., खालापूर ६८ मि.मी., माणगाव ११२ मि.मी., रोहा ९९ मि.मी., सुधागड २७ मि.मी., तळा ९५ मि.मी., महाड ३७ मि.मी., पोलादपूर १६ मि.मी., म्हसळा १०६ मि.मी., श्रीवर्धन १०५ मि.मी., माथेरानमध्ये ११४.२० मि.मी., पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान १ जुनपासून ते ८ ऑक्टोबरपर्यंत एकुण सरासरी ३३५४.१५ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Recent Posts

CSK vs SRH, IPL 2025: धोनीच्या संघाची खराब कामगिरी सुरूच…हैदराबादचा ५ विकेट राखत विजय

चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…

8 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

9 hours ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

9 hours ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

10 hours ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

10 hours ago

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

10 hours ago