मुंबई : भाजपने ‘आदिपुरुष’ या सिनेमाला विरोध दर्शवत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. मात्र या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी यासंदर्भात एक पत्र जाहीर केले आहे. ओम राऊत यांच्याकडून अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे.
मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट केलं आहे, “ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी ‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’ या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट अँड साऊंड शो आजही दिमाखात सुरू आहे”.
अमेय खोपकर पुढे म्हणाले आहेत, “ओम राऊत याच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणे हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’च्या निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे”.
अमेय खोपकर म्हणाले, “आदिपुरुष’ सिनेमाची टीम आणि ओम राऊतच्या मागे मनसे खंबीरपणे उभी आहे. ‘लोकमान्य’ आणि ‘तान्हाजी’ सारखे सिनेमे ओमने बनवले आहेत. ओम राऊत हा हिंदुत्ववादी माणूस आहे. राज्यातल्या सिनेमा समजणाऱ्या हिंदुत्ववादी नेत्यांना माझा प्रश्न आहे, ९५ सेकंदच्या टीझरवरुन सिनेमा कसा असेल याचा अंदाज तुम्ही कसा बांधता? आधी सिनेमा पाहा”.
अमेय खोपकर पुढे म्हणाले, “एक ९५ सेकेंडचा टीझर आऊट होतो आणि त्यानंतर टिका होते हे चुकीचे आहे. हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. पुढच्या पिढीला या सिनेमाच्या माध्यमातून पौराणिक गोष्टी कळतील. राम कदमांना सिनेमा कळत असेल तर त्यांनी सिनेमा बनवावा.” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…