ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना शिंदेंची. ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची : एकनाथ शिंदे

  76

मुंबई : बीकेसी मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची, ना शिंदेंची, ही शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या विचारांची आणि तमाम शिवसैनिकांची शिवसेना आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.


बाळासाहेबांचे खरे वारसदार शिवसैनिक आहेत. वारसा विचारांचा असतो, तो जपायचा असतो. आम्ही त्यांच्या विचारांचा वारसा जपला आहे. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही तर बापाचे विचार विकले. एक मर्यादा असते सहन करण्याची. सत्यासाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली. खरे गद्दार कोण, हे जनतेला समजले आहे. त्यामुळेच जनता आमच्यासोबत आहे. अशी टिका शिंदे यांनी केली आहे.


आम्ही सत्तेसाठी लाचारी पत्कारुन शिवसेना प्रमुखांचा विचार सोडला नाही आणि सोडणार नाही. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि सत्व महत्वाचे आहे. समोर बसलेला प्रत्येक जण बाळासाहेबांचे निष्टावंत सैनिक आहोत. त्यांचे विचार तुमच्या-आमच्या धमन्यामध्ये आहेत. ते कधीच कोणालाही काढता येणार नाहीत.


मी कुणावर टीका करणार नाही. बाळासाहेबांच्या विचाराशी आम्ही कायम आहोत. आमचे विचार बदलणार नाहीत, बदलले नाहीत. तुम्ही मात्र भरकटलात. सत्तेसाठी लाचार झालात. बाळासाहेबांनी कायम हिंदुत्वाचा पुरस्कार केला. पण हिंदुत्ववादी राजकारण करत चूक केली, असे राज्याच्या सर्वेच्च सभागृत तुम्ही सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खूश करण्यासाठी...? बाळासाहेबांची भूमिका चुकीची होती? २५ वर्ष युतीत आम्ही सडलो. हे जाहीरपणे सांगताना तुम्हाला काहीच वाटले नाही का?, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.


एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही गद्दार नव्हे तर तुम्हीच गद्दार आहात. तुम्ही वैचारिक व्याभिचार केला, विचारांशी पाप केले आहे. त्यासाठी पहिला बाळासाहेबांच्या समाधीवर डोके ठेवा, मग आमच्यावर टीका करा. शिवसेना उभारण्यासाठी आम्ही ४० वर्षे काम केले, आंदोलने केली, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. आता आम्हाला गद्दार म्हणता? बाळासाहेबांकडे बघून आम्ही गप्प बसलो. अडीच वर्षांपूर्वीच अनेक आमदारांनी सांगितले होते की ही आघाडी योग्य नाही. पण आम्ही सहन केले. पण बाळासाहेबांचे विचार खु्ंटीला टांगल्यानंतर आम्ही गप्प बसणे शक्य नव्हते. आम्ही जे केले ते राज्याच्या भल्यासाठी केले असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Assembly Session : एसटीची दुरावस्था ते ड्रग्ज तस्करी; अधिवेशनात आज ‘या’ मुद्द्यांवरून होणार खडाजंगी

विधान परिषदेत गाजणार 'हे' महत्वाचे मुद्दे  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज गाजणार आहे. एक

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या