राज्यात सहा महिन्यात ५० हजार वाहनांची खरेदी

  90

मुंबई (प्रतिनिधी) : वाढत्या प्रदुषणाला आळा घालणे, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या वापराला राज्य सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत असून विजेवर धावणाऱ्या वाहनांची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विजेवर धावणाऱ्या ५० हजार २८८ वाहनांची नोंदणी झाली आहे. राज्य सरकारने २०२५ पर्यंत नोंदणी होणाऱ्या नव्या वाहनांपैकी दहा टक्के वाहने विजेवर धावणारी असतील असा संकल्प सोडला आहे.


पारंपरिक इंधनाचा तुटवडा आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विजेवर धावणाऱ्या वाहनांबाबतचे धोरण जाहीर केले. त्याला गती देण्यासाठी राज्य सरकारनेही आपले धोरण जाहीर केले. विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या मागणीत वाढ व्हावी म्हणून त्यांच्या खरेदीवर प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विजेवरील दुचाकीसाठी कमाल दहा हजार रुपये, मोटारगाडीसाठी दीड लाख रुपये, बससाठी २० लाख रुपये, प्रवासी रिक्षा आणि मालवाहू रिक्षासाठी २० हजार रुपये आणि अन्य वाहनांसाठीही सवलत दिली आहे. या सवलतींमुळे विजेवरील वाहनांच्या खरेदीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.


राज्यात २०१९-२० मध्ये विजेवर धावणाऱ्या सात हजार ४०० वाहनांची, एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ मध्ये ५१ हजार ४२६ वाहनांची नोंद झाली होती. आता विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या नोंदणीत वाढ झाली असून एप्रिल २०२२ ते ३ ऑक्टोबर २०२२ काळात राज्यात ५० हजार २८८ वाहनांची नोंदणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील अंधेरी आरटीओत एक हजार २३७, बोरिवली आरटीओत एक हजार २२४, ताडदेव आरटीओत एक हजार ३१६ आणि वडाळा आरटीओत एक हजार ३७ वाहनांची नोंद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण