राजापूर तालुक्यात जनावरांवर सांसर्गिक गर्भपाताचे सावट

Share

राजापूर (प्रतिनिधी) : वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे अनेक आजार फोफावत आहेत. यात जनावरेही सुटलेली नाहीत. सध्या जनावरांवर सांसर्गिक गर्भपाताचे संकट घोंगावत आहे. जनावरांना होत असलेल्या लम्पीच्या प्रादुर्भावानेही डोके वर काढले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतर्गंत जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. तालुक्यातील सुमारे ३२ हजार जनावरांपैकी साडेसहा हजार जनावरांना लसीकरण केल्याची माहिती पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. सुर्वे यांनी दिली.

बदलत्या वातावरणामुळे विविध रोग आणि साथींचा फैलाव होत असताना जनावरांनाही सांसर्गिक गर्भपाताचे संकटाचा सामना करावा लागत आहे. जनावरांना हा आजार ब्रुसेला बॅक्टेरीयापासून होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या संसर्गाचा परिणाम जनावरांच्या गर्भधारणेवर होतो. आजार संसर्गजन्य असल्याने त्याचा धोका एकमेकांच्या सानिध्यातील सर्व जनावरांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने ही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.

अशा आजाराचा संसर्ग झाल्याची तालुक्यात जनावरे सद्यस्थितीमध्ये आढळून आलेली नाहीत. मात्र, तालुक्यातील सुमारे ३२ हजार जनावरांना हे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुर्वे यांनी दिली. तालुक्यातील गावे विखुरलेली असल्याने लसीकरणाच्या वेगाला मर्यादा येत असल्या तरी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त जनावरांना लसीकरण करण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माणसांनाही जनावरांपासून धोका

जनावरांना होणार हा आजार संसर्गजन्य आहे. त्याचा संसर्ग जनावरांपासून जनावरांना तर होतोच. शिवाय बाधित झालेल्या जनावरांपासून हा संसर्ग पशुपालकांनाही होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे हा आजार अधिक घातक असल्याने त्यावर वेळीच प्रतिबंध करण्याच्यादृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत.

Recent Posts

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

20 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

52 minutes ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

6 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

9 hours ago