स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर

मुंबई : स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लुप्त झालेल्या होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीमधील जीनोम संबंधित अभ्यासाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे


स्वीडनचे स्वांते पाबो हे एक जेनेटिस्ट असून ते मानवी उत्क्रांतीसंबंधी संशोधन करतात. ते पॅलिओजेनेटिक्सच्या संस्थापक शास्त्रज्ञांपैकी एक असून त्यांनी निअॅन्डरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणात संशोधन केले आहे. त्यांच्या नावाची घोषणा करताना नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे की, आपल्या संशोधनातून स्वांते पाबो यांनी असे काही केले आहे की जे या आधी अशक्य समजले जायचे. निअॅन्डरथल जीनोमचा क्रम ठरवणे हे त्यांचे मोठे संशोधन आहे.


निअॅन्डरथल जीनोम सध्या लुप्त झाले आहे. स्वांते पाबो यांनी होमिनिन डेनिसोवा यासंबंधितही संशोधन केलं आहे. होमिनिन्स जीन्स सध्या झालेले आहेत. पण त्यांचे हस्तांतर होमो सेपियन्समध्ये झाल्याचा शोध स्वांते पाबो यांनी लावला आहे. जुन्या जीन्सचे आताच्या पीढीपर्यंत हस्तांतर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीचे विजेते डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पॅटपुटियन यांचा समावेश होता. त्यांचा शोध मानवी शरीराचे तापमान आणि स्पर्श कसे ओळखतात यावर आधारित होते.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला