नामपूर (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील नामपूर येथील सुमारे पाचशे एकर क्षेत्रातील मक्याचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिपावसामुळे मक्याची मुळे सडून वाढ खुंटल्याने उत्पादकतेवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
हरणबारी धरणाच्या आवर्तनाद्वारे रब्बी हंगामासाठी नामपूरमधील शेतीला कालव्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मोसम नदीच्या परिसरातील सुमारे पाचशे एकर क्षेत्र ओलीताखाली येते. मका पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जून महिन्यात मक्याचा पेरा घेतला. परंतु, यंदा सुरवातीपासूनच पावसाचा कहर असल्याने मक्याच्या पिकाची अक्षरशः माती झाली आहे.
शेतकऱ्यांना यंदा पहिल्यांदा ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. यंदा मार्च महिन्यापासून साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला भाव नाही, तेल्या रोगाने डाळिंबबागा संकटात आहेत, खरिपाच्या हंगामात मजुरीचा खर्चही निघणार नाही, अशी वस्तुस्थिती असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशा प्रतिकूल परिस्थितीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने याबाबत गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…