ठाणे जिल्ह्यातील शासकीय बालगृह, निरीक्षण गृह आठ दिवसांपासून अंधारात

  191

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील शासकीय बालगृह, निरीक्षण गृह आठ दिवसांपासून अंधारात आहेत. जिल्हा महिला बालविकास विभागातर्फे उल्हासनगर येथे बालकांचे निरीक्षण गृह, अपंग बालकांचे बालगृह, मुलांचे वसतिगृह, महिलांसाठी आधारगृह चालविण्यात येते. या सर्व ठिकाणचे मागील काही महिन्यांचे विद्युत देयक थकल्याने महावितरणातर्फे यासर्व इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. या गृहांमध्ये राहणाऱ्या बालकांची आणि महिलांची एकुण संख्या ही सुमारे ३५० ते ४०० इतकी आहे. या गृहांमध्ये सर्व बालक आणि महिला शासनाच्या भोंगळ कारभारामुळे आठ दिवसांपासून अंधारात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.


जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने बालगृह तसेच निरीक्षणगृह तसेच वसतिगृह चालविण्यात येतात. यातील काही वसतिगृह ही शासन आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चालविली जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यात शासनमान्य २८ बालगृह आहेत. यातील अधिकतर बालगृहे ही सामाजिक संस्थांच्या वतीने चालविली जातात. तसेच यांचा खर्च देखील संबंधित सामाजिक संस्थांच्या वतीने उचलण्यात येतो. यात निराधार, एकल पालक, रस्त्यावरील, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलांचा सांभाळ कारण्यात येतो. तसेच अत्याचार पीडित, निराधार, गरजू महिलांना शासनाच्या वतीने महिलांच्या शासकीय आधारगृहात आश्रय दिला जातो. उल्हासनगर येथे जिल्हा प्रशासनातर्फे बालकांचे निरीक्षणगृह, अपंग बालकांचे बालगृह, मुला-मुलींचे बालगृह आणि महिलांचे सुधारगृह चालविण्यात येते.

Comments
Add Comment

पर्यावरणपूरक-ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन ठाणे  : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात

सहा वर्षीय मुलीच्या चिकटलेल्या बोटांवर यशस्वी सर्जरी

ठाणे : जन्मजात हातापायाची बोटे चिकटलेली असल्यास भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. वेळेत शस्त्रक्रिया

बदलापूरची जांभळे लंडनच्या बाजारपेठेत दाखल

बदलापूर : देशातील पहिले भौगोलिक मानांकन मिळालेली बदलापुरातील जांभळे आता देशाची सीमा ओलांडून लंडनच्या

वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हे

डोंबिवली  : शहरातील पश्चिम रेल्वेस्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण

शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार शेतीसंदर्भातील दैनंदिन माहिती

जिल्हा परिषद कृषी विभागाचा अभिनव उपक्रम ठाणे : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या कामात झाला तर, शेतकऱ्यांना

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल