ठाणे जिल्ह्यातील शासकीय बालगृह, निरीक्षण गृह आठ दिवसांपासून अंधारात

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील शासकीय बालगृह, निरीक्षण गृह आठ दिवसांपासून अंधारात आहेत. जिल्हा महिला बालविकास विभागातर्फे उल्हासनगर येथे बालकांचे निरीक्षण गृह, अपंग बालकांचे बालगृह, मुलांचे वसतिगृह, महिलांसाठी आधारगृह चालविण्यात येते. या सर्व ठिकाणचे मागील काही महिन्यांचे विद्युत देयक थकल्याने महावितरणातर्फे यासर्व इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. या गृहांमध्ये राहणाऱ्या बालकांची आणि महिलांची एकुण संख्या ही सुमारे ३५० ते ४०० इतकी आहे. या गृहांमध्ये सर्व बालक आणि महिला शासनाच्या भोंगळ कारभारामुळे आठ दिवसांपासून अंधारात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.


जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने बालगृह तसेच निरीक्षणगृह तसेच वसतिगृह चालविण्यात येतात. यातील काही वसतिगृह ही शासन आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चालविली जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यात शासनमान्य २८ बालगृह आहेत. यातील अधिकतर बालगृहे ही सामाजिक संस्थांच्या वतीने चालविली जातात. तसेच यांचा खर्च देखील संबंधित सामाजिक संस्थांच्या वतीने उचलण्यात येतो. यात निराधार, एकल पालक, रस्त्यावरील, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलांचा सांभाळ कारण्यात येतो. तसेच अत्याचार पीडित, निराधार, गरजू महिलांना शासनाच्या वतीने महिलांच्या शासकीय आधारगृहात आश्रय दिला जातो. उल्हासनगर येथे जिल्हा प्रशासनातर्फे बालकांचे निरीक्षणगृह, अपंग बालकांचे बालगृह, मुला-मुलींचे बालगृह आणि महिलांचे सुधारगृह चालविण्यात येते.

Comments
Add Comment

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ