देशभरात पीएफआयच्या ठिकाणांवर एनआयए, ईडी चे छापे; १०६ जण अटकेत

  114

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकसह १० राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. एनआयए आणि ईडीने या राज्यांमधील पीएफआयच्या राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेतली. या कारवाईत तपास यंत्रणेने आणखी १०६ जणांना अटक केली आहे.


एनआयएची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे, ज्याअंतर्गत पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दहशतवादाला निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे आणि लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथीय बनवणे, यात गुंतलेल्या व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांकडून शोध घेण्यात येत आहे.


पीएफआय ही अत्यंत वादग्रस्त संस्था आहे. या संस्थेचे महाराष्ट्रातील पुण्यात पुणे जिल्ह्यामध्ये हब असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाकडून इतर यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणी जमियत उलेमा ए हिंदचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाकडून इतर यंत्रणांना अलर्ट दिला आहे.


एनआयएने तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेंकासीसह अनेक ठिकाणी पीएफआय नेत्यांच्या घरांची झडती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई पीएफआय स्टेट हेड ऑफिस पुरसावक्कम येथेही झडती घेण्यात आली आहे. एनआयए आणि ईडीने पीएफआयचे अध्यक्ष ओमा सलाम यांच्या मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथे मध्यरात्रीपासून छापे टाकले आहेत.

Comments
Add Comment

LPG Cylinder Price Cut : LPG ग्राहकांना दिलासा! आजपासून कमी झाली किंमत; 'हे' आहेत नवे दर

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी (July 2025) एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाला

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी