पोल्ट्री शेडमध्ये पाणी शिरल्याने १२ हजार कोंबड्या मृत्यूमुखी

  110

उजणी (वार्ताहर) : सिन्नर ता. पुर्व भागातील मौजे उजणी व परिसरामध्ये ढगफुटी सद्रृश्य पावसाने हाहाकार माजवला. उजणी परिसरातील गावाशेजारील पाझर तलाव हा एक महिन्यापूर्वीच तुडुंब भरून सांडवा निघालेला असतांना अतिवृष्टी झाली. यामुळे पाझर तलाव शेजारी असलेले शेतकरी मच्छिंद्र भिमाजी लोहार (शिरसाठ) यांचे गट क्र. १४७ मध्ये १२ हजार कोंबड्याचे पोल्ट्री शेडमध्ये अचानक पाणी शिरले. या संपूर्ण कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत.


४५ दिवसांपूर्वीच लोहार यांनी पक्षी ४८ रूपये प्रतीपक्षी प्रमाणे व खाद्य विकत घेऊन त्यांचे चांगले संगोपन केले होते. एक-दोन दिवसात कोंबड्यांची विक्री होणार होती.


लोहार यांचे संबंधित कंपनीसोबत दरही ठरलेला होता. अतिवृष्टीने लोहार यांचे सुमारे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच लोहार यांच्या पोल्ट्री शेड शेजारील गट क्र. १४७ मध्ये तीन एकर टोमॅटो प्लॉटही जलमय झाला आहे. या नुकसानीचा पंचनामा करून मला शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा लोहार कुटुंबानी व्यक्त केली.


पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अचानक आलेल्या पाण्याचे प्रवाहाने अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कामगार तलाठी यांनी दोनच दिवस दिले होते. अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे होणे अजूनही बाकी आहे. तरी महसूल विभागाने त्वरीत सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करूण पंचनामे करावे व शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Comments
Add Comment

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर