Categories: कोलाज

शरदाचे चांदणे

Share

डॉ. लीना राजवाडे

वाचक हो, मागील लेखात म्हटल्याप्रमाणे ज्याचेवर आपला हा जीव अवलंबून आहे, अशा रक्ताची आपण कशी काळजी घेतली पाहिजे, हेही समजले पाहिजे. या लेखात निसर्गातील कोणते बदल सजग राहून तसा आहार विहार ठेवल्याने हे साधता येऊ शकते ते पाहू.

निसर्ग स्वतःहून खरं तर हा समतोल बिघडू न देण्यासाठी आपले कालचक्र अजून तरी बरेच अंशी प्रयत्नशील असतो. शास्त्रात सांगितलेले ऋतुचर्येतील आहार-विहारातील नियम जो मनुष्य सांभाळून आचरण करतो, त्याला ऋतुनुसार कमी-जास्त होणारे वातादी दोष उपद्रव स्वरूप ठरत नाहीत. हे या लेखात पुन्हा सांगण्याचे कारण, रक्ताला संकटात टाकणारे, वातावरणातील बदल हे आपल्या नियंत्रणात नाहीत. तरी आपले खाणे-पिणे तरी नक्कीच आपल्याला नियंत्रणात आणता येते. गरज आहे ते समजून करण्याची. पावसाळा अजून काही काळ असेल, साधारणपणे परतीचा पाऊस असे म्हटले तरी हळूहळू ऊन देखील कडक होऊ लागले आहे. हवा गरम होऊ लागली आहे. थोडक्यात ऋतू संधिकाल सुरू झाला आहे. पावसाळा संपून शरदाची चाहूल लागते आहे. संधिकालात पावसाळ्यातील ऋतुचर्या ठेवायचीच आहे, हळूहळू पित्तकाल जवळ येणार आहे, हे लक्षात घ्यायचे आहे. आता शरद ऋतूतील हितकर गोष्टी कोणत्या हे समजावून घेऊ.

  • शरद ऋतूत आहारात पुढील गोष्टींचा समावेश विशेष करून करावा. तूप, मधुर, कडू आणि तुरट रसाचे पदार्थ, पचायला हलके पदार्थ, साखर, खडीसाखर, आवळा, पडवळ, मध, उसाचा रस, जांगल प्राणी कोंबडीचे सूप, गहू, जच, मूग, तांदूळ, दही, आंबट, तिखट रस, तीक्ष्ण उष्ण पदार्थ वर्ज करावे.
  • व्यायाम दिवसा झोपणे, उन्हात फिरणे टाळावे.
  • अगस्ती तारा उदयाला येतो. त्यानंतर दिवसा सूर्यकिरणांनी, रात्री चंद्र किरणानी थंड झालेले, निर्विष पाणी पिण्यासाठी उत्तम. हंसोदक अशी याला शास्त्रात संज्ञा आहे. पंचांगात किंवा केलेंडरमध्ये अगस्ती उदय लिहिलेला असतो. ते पाहावे.
  • ज्या व्यक्तींना पित्ताचे विकार होतात, त्यांनी तर विशेषकरून वरील पथ्यापथ्य सांभाळावे.
  • खाण्या-पिण्याच्या सवयींबरोबर विहार कसा असावा, याचाही शास्त्रात निर्देश आहे. प्रसन्न वाटेल अशा प्रकारचे कपडे, अलंकार घालावेत, सुगंधी फुले केसात माळावीत. मित्र-मैत्रिणी, आप्तेष्ट यांच्या सोबत बागेत मजेत वेळ घालवावा. याचा परिणाम मन आनंदी राहाते. ताणरहित राहिल्याने उत्साह वाटतो, रक्त शरीरात निरोगी रहायला मदत होते.
  • ऑगस्टमध्य ते ऑक्टोबरमध्य असा हा कालावधी असतो. तेव्हा शरद ऋतूतील चर्या सांभाळावी, तर शरदातील टिपूर चांदणं, मसाला दूध यामुळे आनंदमयी होईल. रक्ताचे स्वास्थ्य टिकायला मदत होईल.
  • पावसाळ्यात थंड हवा ज्यामुळे वात दोष प्र कुपित होतो, त्याच्या जोडीला सूर्याच्या तप्त किरणांमुळे शरद ऋतूत पित्त देखील प्रकुपित होते. त्यामुळे ऋतू बदल होताना नक्कीच, पण एकूणच योग्य प्रमाणात पित्ताचे शमन होईल, त्याचे वाढलेले तीक्ष्ण उष्ण गुण रक्ताला त्रासदायक होणार नाहीत यासाठी ऋतुचर्येचे नियम पाळून राहावे.
  • ऋतुचर्या याविषयी मी लिहिलेल्या लेखात सांगितले होते. विसर्ग काल हा माणसाला निसर्गाकडून ताकद मिळण्याचा काळ असतो. पावसाळ्यापासून त्याची हळूहळू सुरुवात होते. शरदात ते मध्यम होते. पुढे थंडीत उत्तम मिळते. याचे कारण वरील विवेचनातून स्पष्ट होईल.
  • रक्ताशी साहचर्यानी राहणारा शरीरातील घटक म्हणजे पित्त होय. ते वाढून बिघडण्याचा मोठा कालावधी म्हणजे शरद ऋतू होय. त्यामुळे ते पित्त खराब होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून ऋतू चर्या पाळावी. तरीही याखेरीज ज्यांचे रक्त बिघडते त्यांनी योग्य वैद्यकीय सल्ल्याने उपाय योजना करावी.
  • रक्त हे जीवन आहे. ते चांगले राहावे यासाठी आणखीनही गोष्टी समजणे महत्त्वाचे आहे. निसर्गातील सातत्याने येत राहणारे, त्यापरत्वे होणारे बदल जसे यासाठी कारणीभूत असतात, तसेच आणखीन विषय आहेत. विरुद्धान्न सेवन हा आहाराशी निगडित असणारा महत्त्वाचा विषय. त्याविषयी जाणून घेऊ पुढील लेखात.

तेव्हा वाचक हो, आपण सारे, शरद ऋतुचर्या सांभाळत, कोजागरी पौर्णिमेला शरदातील चांदण्याचा आनंद नक्की घ्याल, याची खात्री वाटते.

Recent Posts

RCB vs RR, IPL 2025: आरसीबीचे राजस्थानला २०६ धावांचे आव्हान

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

5 minutes ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

14 minutes ago

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

37 minutes ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

1 hour ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

1 hour ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

2 hours ago