तैवानमध्ये भुकंपाचे २४ तासात १००हून अधिक धक्के

  73

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तैवानमध्ये रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. येथे गेल्या २४ तासात १०० हुन अधिकवेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ एवढी होती. हा भूकंप तैवानपासून ८५ किमी पूर्वेला दुपारी १२.१४ वाजता जाणवल्याची माहिती आहे. तसेच तैवानच्या किनारपट्टीवर ७.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर जपानने सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.


अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे की, जपानला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या २४ तासांत तैवानच्या वेगवेगळ्या भागात १०० वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कुठे दरड कोसळल्याचे चित्र आहे, तर कुठे पूल पडल्याचे. येथे शनिवारीही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ एवढी होती. भूकंपामुळे काही घरांचे नुकसान झाल्याचे तैवान सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर रेल्वे सेवाही विस्कळीत झाली असल्याचे ते म्हणाले आहेत.


सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. लोकांनी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ते म्हणाले, भूकंपामुळे दक्षिणेकडील काओशुंग शहरातील मेट्रो सेवा बराच काळ प्रभावित झाली होती. तैवान रेल्वे प्रशासनाने हुवालियन आणि तैटंगला जोडणाऱ्या गाड्या तात्पुरत्या थांबण्यात आल्या आहेत. यासोबतच हायस्पीड रेल्वे सेवाही रद्द करण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू ताइतुंग काउंटीच्या उत्तरेला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण