तैवानमध्ये भुकंपाचे २४ तासात १००हून अधिक धक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तैवानमध्ये रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. येथे गेल्या २४ तासात १०० हुन अधिकवेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ एवढी होती. हा भूकंप तैवानपासून ८५ किमी पूर्वेला दुपारी १२.१४ वाजता जाणवल्याची माहिती आहे. तसेच तैवानच्या किनारपट्टीवर ७.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर जपानने सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.


अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे की, जपानला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या २४ तासांत तैवानच्या वेगवेगळ्या भागात १०० वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कुठे दरड कोसळल्याचे चित्र आहे, तर कुठे पूल पडल्याचे. येथे शनिवारीही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ एवढी होती. भूकंपामुळे काही घरांचे नुकसान झाल्याचे तैवान सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर रेल्वे सेवाही विस्कळीत झाली असल्याचे ते म्हणाले आहेत.


सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. लोकांनी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ते म्हणाले, भूकंपामुळे दक्षिणेकडील काओशुंग शहरातील मेट्रो सेवा बराच काळ प्रभावित झाली होती. तैवान रेल्वे प्रशासनाने हुवालियन आणि तैटंगला जोडणाऱ्या गाड्या तात्पुरत्या थांबण्यात आल्या आहेत. यासोबतच हायस्पीड रेल्वे सेवाही रद्द करण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू ताइतुंग काउंटीच्या उत्तरेला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला