मुंबई (वार्ताहर) : मध्य रेल्वेवर शुक्रवारी स्वच्छता पंधरवडा साजरा करायला सुरुवात झाली. २ ऑक्टोबरपर्यंत हा पंधरवडा चालणार आहे.
मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेचे प्रधान विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वच्छता प्रतिज्ञा दिली. दि. १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेवर स्वच्छता पंधरवडा पाळला जाणार आहे. ज्यामुळे रेल्वे स्थानके, ट्रेन, कार्यालये, वसाहती, कार्यशाळा, देखभाल डेपो, रुग्णालये इत्यादी ठिकाणी स्वच्छतेत सुधारणा दिसून येईल.
मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि सर्व विभागांचे रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वच्छतेसाठी वचनबद्धतेची आणि स्वच्छतेसाठी वर्षातून १०० तास म्हणजे आठवड्यातून दोन तास स्वत:, कुटुंब, परिसर, गाव आणि कामाच्या ठिकाणी पुढाकार घेऊन स्वेच्छेने स्वच्छतेचे कार्य करण्यासाठी, एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात जनजागृती, प्लास्टिकचा कमीत कमी वापर आणि पुढाकार घेण्याची प्रतिज्ञा घेतली.
विविध कार्यालये, युनिट्स आणि डेपो येथे श्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…