गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत पाऊस कमी

  89

मुंबई (वार्ताहर) : गेल्या तीन महिन्यांत मुंबईत २,४७२ मिमी पाऊस झाला. मुंबईत सरासरी ९१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७ टक्के कमी पाऊस झाला. पावसाचा साधारण एक महिना बाकी असून त्यात बॅकलॉग भरून निघण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या महितीनुसार मुंबईत आतापार्यंत एकूण सरासरी २,४७२ किमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी तीन महिन्यांत सरासरी २,५०२ मिमी पाऊस झाला होता. त्या वेळी पावसाचे प्रमाण ९९ टक्क्यांच्या वर होते.


यंदा १२ सप्टेंबरपर्यंत कुलाबा १,८६२.५० मिमी आणि सांताक्रूझ २,४०१.२० मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी २०२१ मध्ये १२ सप्टेंबरपर्यंत कुलाब्यात २,१७५.१; तर सांताक्रूझमध्ये २८२९.२ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा सरासरी ७ टक्के कमी पाऊस झाला.


यंदा पूर्व उपनगरामध्ये अधिक पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात सर्वाधिक २,४५८.५७ मिमी पाऊस पडला. त्याखालोखाल पश्चिम उपनगर २,२३९.६४ मिमी आणि शहरात २,१०३.९४ मिमी पावसाची नोंद झाली. शहरामध्ये ९३.९३; तर दोन्ही उपनगरांमध्ये प्रत्येकी ८६.८४ मिमी पाऊस झाला.


कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारण ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. रात्री गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पावसाचा बॅकलॉग भरून निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता