चांगले आमच्यामुळे, वाईट तुमच्यामुळे, हे योग्य नाही : उदय सामंत

  90

मुंबई (प्रतिनिधी) : वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचे खापर आमच्यावर फोडू नका. सगळे जे वाईट होत आहे, ते आमच्यामुळे आणि चांगले घडत आहे, ते तुमच्यामुळे असे होत नसते, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘मविआ’वर केली. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.


‘मविआ’वर टीका करत सामंत म्हणाले, वाईट झाले तर आमच्यामुळे झाले. ही राजकारणातली वाईट प्रवृत्ती आहे, तिचा मी जाहीर निषेध करतो. हा प्रोजेक्ट इथे आणण्यासाठी ८ ते ९ महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. अनेक इनसेनटिव्ह योजना शासनासमोर ठेवल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वीच शिंदे-फडणवीसांचे सरकार आले. वेदांताला आणखी काही देता येईल का, याविषयी चर्चा झाल्या. स्वतः अनिल अग्रवालजीं यांच्यांशी देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली होती. पण, मागचा काही अनुभव पदरी आलेला असताना त्यांनी प्रकल्प गुजरातला हलवण्याचे ठरवले.


६ महिन्यांत फक्त भेटीगाठी झाल्या. मात्र, कोणताही निर्णय होऊ शकला नाही. फॉक्सकॉन प्रकल्प येणार नाही, अशीच मविआची मानसिकता होती. मविआने हाय पॉवर कमिटीची मीटिंग घेतली नाही. हा ७ जानेवारी २०२२ मधला अहवाल आहे. हा प्रकल्प गेला आहे, याचे दु:ख आम्हालाही आहे. चांगले झाले तर ते आमच्यामुळे झाले आणि वाईट झाले ते तुमच्यामुळे झाले, ही प्रवृत्ती योग्य नाही, अशी टीका त्यांनी मविआवर केली.


महाराष्ट्राला मोठा प्रोजेक्ट देण्याचे मोदींचे आश्वासन


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींशी याबाबत चर्चा केली असून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. कंपनीला वेळेत इनसेनटिव्ह पॅकेज दिले गेले असते तर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला नसता. परंतु, याचे खापर शिंदे आणि फडणवीस सरकारवर फोडले जात आहे, असा घणाघातही त्यांनी मविआवर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यात याच तोडीचा किंबहुना यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला, युवा पिढीला देऊ. जो रोजगार अपेक्षित आहे, तो आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदेंना दिल्याचे सामंतांनी सांगितले.


महाविकास आघाडीच जबाबदार


वेदांतचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी चर्चा करताना त्यांना वेदांत प्रकल्पावरुन प्रश्न विचारण्यात आला. ‘आमच्या शिवसेना-भाजपा सरकारला दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ‘वेदांत समुहा’चे मालक अनिल अग्रवाल यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीत मी होतो, उपमुख्यमंत्री होते, कंपनीचे प्रमुख संचालक होते. त्यांनाही आम्ही विनंती केली होती. सरकार आपल्याला ज्या काही सवलती आहेत त्या निश्चित देईल असे त्यांना सांगण्यात आले होते. तळेगावजवळ ११०० एकर जमीन आम्ही देऊ केली होती,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.


हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे सांगितले. “त्यांना ३३ ते ३५ हजार कोटींच्या सवलती दिल्या होत्या. त्यामध्ये सगळ्याच गोष्टी होत्या, सबसिडी वगैरे आम्ही ऑफर केल्या होत्या. मात्र गेले दोन वर्षं त्यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा होता तो कमी पडला असावा. आमच्या नवीन सरकारने त्यांना पूर्णपणे सवलती देऊ केल्या होत्या,’ असे म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवले आहे.

Comments
Add Comment

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर

सार्वजनिक वाहनांमध्ये बसवणार पॅनिक बटण, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे