पालिकेत कचरा घोटाळा; माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांचा आरोप

  76

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याचे संकलन करणे, विल्हेवाट लावणे व कचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढली होती. त्या निविदेसाठी दोन निविदाकारांनी एक कार्टेल तयार करून निविदेत घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे.


विनोद मिश्रा म्हणाले की, एका कंपनीला महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी निवडले आहे. यापैकी एका निविदाकाराला नागपूर महानगरपालिकेने आधीच काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या निविदाकाराला कंत्राट मिळण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मदत केली असल्याचाही आरोप मिश्रा यांनी केला आहे. महापालिकेने या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये बदल करून कंत्राटदारांना फायदा मिळवून दिला आहे. तसेच आता तीच निविदा दर रु. १५००/- प्रति मेट्रिक टन आहे, जो प्रचलित दराच्या जवळपास तिप्पट आहे आणि निविदाकार ३५ टक्के आहेत.


त्यामुळे महापालिकेचे १००० कोटी रुपयांहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यात ठेकेदाराला कचऱ्यात भेसळ करू नये व कचरा संकलन प्लांट जिथे असेल तिथे सीआरझेड परवानगी हवी अशी मागणी केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून बृहन्मुंबई महापालिकेने ही निविदा रद्द करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विनोद मिश्रा यांनी केली आहे.


घनकचरा विभागाचे कंत्राटदार व अधिकारी अनेक कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणावर अटींचा भंग करून लूट सुरूच असून याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मिश्रा यांनी केली आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर