पालिकेत कचरा घोटाळा; माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याचे संकलन करणे, विल्हेवाट लावणे व कचरा व्यवस्थापनासाठी निविदा काढली होती. त्या निविदेसाठी दोन निविदाकारांनी एक कार्टेल तयार करून निविदेत घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला आहे.


विनोद मिश्रा म्हणाले की, एका कंपनीला महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी निवडले आहे. यापैकी एका निविदाकाराला नागपूर महानगरपालिकेने आधीच काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या निविदाकाराला कंत्राट मिळण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मदत केली असल्याचाही आरोप मिश्रा यांनी केला आहे. महापालिकेने या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये बदल करून कंत्राटदारांना फायदा मिळवून दिला आहे. तसेच आता तीच निविदा दर रु. १५००/- प्रति मेट्रिक टन आहे, जो प्रचलित दराच्या जवळपास तिप्पट आहे आणि निविदाकार ३५ टक्के आहेत.


त्यामुळे महापालिकेचे १००० कोटी रुपयांहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यात ठेकेदाराला कचऱ्यात भेसळ करू नये व कचरा संकलन प्लांट जिथे असेल तिथे सीआरझेड परवानगी हवी अशी मागणी केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून बृहन्मुंबई महापालिकेने ही निविदा रद्द करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विनोद मिश्रा यांनी केली आहे.


घनकचरा विभागाचे कंत्राटदार व अधिकारी अनेक कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणावर अटींचा भंग करून लूट सुरूच असून याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मिश्रा यांनी केली आहे.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित