साथीच्या आजारांचा धोका कायम; अकरा दिवसांत मलेरियाचे २०७ रुग्ण

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबईत साथीच्या आजारांचा धोका कायम आहे. मलेरिया, लेप्टो आणि स्वाईन फ्ल्यूचा धोका कायम असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अकरा दिवसांत मुंबईत मलेरियाचे २०७ रुग्ण आढळल्यामुळे पालिकेची डोकेदुखी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.


पावसाळी आजार नियंत्रणात आणण्यासाठी पलिका उपाययोजना करत असली, तरी साथीचे आजार कमी व्हायचे नाव नाही. १ ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबईत मलेरियाचे २०७, डेंग्यूचे ८०, लेप्टोचे १८, तर स्वाइन फ्ल्यूचे ६ रुग्ण आढळले आहेत. सध्या मुंबईत लेप्टो आणि स्वाइन फ्ल्यूची रुग्णसंख्या वाढत असल्याचे पालिकेच्या माहितीतून समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोचा प्रसार वाढत असल्याची शक्यता आहे. २०२१ मध्ये सप्टेंबर महिन्यात मलेरीयाचे ६०७, डेंग्यूचे २५६ आणि लेप्टोचे ८०, तर स्वाईन फ्ल्यूचे पूर्ण महिन्यात ९ रुग्ण आढळले होते. मात्र यंदा केवळ ११ दिवसांत स्वाइन फ्ल्यूचे ६ रुग्ण आढळल्याने पालिकेची चिंता वाढली आहे.


दरम्यान स्वाइन फ्ल्यू आणि लेप्टो आजाराबाबत दक्षता घेण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे. ताप, घसा दुखणे, डोके दुखणे,अंगदुखी, मळमळ अशी स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. अति ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी ही लक्षणे लेप्टोची आहेत. जर अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात उपचार घ्यावे, असा सल्ला पालिकेने दिला आहे.


आजार ११ सप्टेंबरपर्यंत


मलेरिया २०७
डेंग्यू ८०
लेप्टो १८
गॅस्ट्रो १२१
हेपटायटीस १४
चिकनगुनिया २
स्वाइन फ्ल्यू ६

Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक