भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक

मुंबई : गेल्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र कॅबचे आणि टॅक्सीचे भाडे अजूनही वाढवण्यात आलेले नाही. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने टॅक्सीच्या भाड्यात सुधारीत भाडेवाढ लागू करावी अशी मागणी टॅक्सी संघटनेकडुन करण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.


आता भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक झाल्या आहेत. वाढते इंधन दर पहाता टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली आहे. भाडेवाढ न झाल्यास येत्या १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.


टॅक्सी चालक आणि रिक्षाचालक यांनी राज्य सरकारने भाडेवाढीच्या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. मुंबईत प्रति किलोमीटरसाठी २५ रुपये दर आहे, त्यामध्ये १० रुपयांची वाढ करावी, अशी मागणी करत टॅक्सी चालकांनी १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना