विसर्जनातून साडे पाच लाख किलो निर्माल्य जमा; पालिका करणार खत निर्मिती

मुंबई (प्रतिनिधी) : दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला भाविकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. विसर्जनस्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. या निर्माल्य कलशात तब्बल ५ लाख ४९ हजार ५१५ किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यापासून पालिका खत निर्मिती करणार असून पालिकेच्या उद्यानातील झाडांना या खताचा वापर केला जाणार आहे.


दरम्यान ५ लाख ४९ हजार ५१५ किलो निर्माल्यापासून पालिका सेंद्रीय खत तयार करणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक निर्माल्य संकलन हे अनुक्रमे भांडुप (एस विभाग), अंधेरी पश्चिम (के पश्चिम) व बोरिवली पश्चिम (आर मध्य) या विभागांमध्ये झाले आहे. या निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार करण्याची कार्यवाही घनकचरा विभागाची आहे. सुमारे ५ लाख ४९ हजार ५१५ इतक्या मोठ्या प्रमाणातील निर्माल्य हे महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे. आता ह्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरुवातही झाली आहे.


पुढील साधारणपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रुपांतर सेंद्रीय खतामध्ये होईल, अशी माहिती मुंबई पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यामार्फत देण्यात आली आहे. तयार होणारे सेंद्रीय खत पालिकेच्या उद्यानांमध्ये असलेल्या झाडांकरिता वापरण्यात येणार आहे.


गणेशोत्सवादरम्यान मुंबई शहर, उपनगरात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जित केलेले निर्माल्य गोळा करण्यासाठी ४१९ निर्माल्य कलश पुरविण्यात आले होते. त्याचबरोबर हे निर्माल्य गोळा करून खत निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी ३८१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. यानुसार सर्व २४ विभागांमधून निर्माल्य गोळा करण्यात आले आहे.


सर्वात जास्त निर्माल्य (विभाग)


एस विभाग - ७७,८२५ किलो
आर मध्य विभाग - ५५,७०० किलो
के पश्चिम विभाग - ५९,५०० किलो
एच पूर्व विभाग - ४६,२८० किलो


सर्वात कमी निर्माल्य (विभाग)


बी विभाग - २५३ किलो
सी विभाग - ९०० किलो
ए विभाग - १,०१० किलो
ई विभाग – १,३५५ किलो

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या