१० दिवसात नव्या पक्षाची घोषणा : गुलाम नबी आझाद

श्रीनगर (वृत्तसंस्था) : काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या १० दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी जम्मू-काश्मीरमधील एका जाहीर सभेत सांगितले. ७३ वर्षीय आझाद यांनी रविवारी बारामुल्ला येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर भाजपचा असल्याचा आरोप होतो, पण मी फक्त पैगंबराचा गुलाम आहे.


ते पुढे म्हणाले, मी विरोधी पक्षनेता होतो, मी ४ तास मैदानावर बसून आंदोलन केले. मी कधीच धर्माच्या नावावर रक्तपात आणि मतदान होऊ देणार नाही. कलम ३७० वरील माझे भाषण किमान २०० देशांनी ऐकले आहे. मी ३७० वर का बोलत नाही असा आरोप माझ्यावर करण्यात आला. मी इथे मतांसाठी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी आलो नाही. गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाहीत. यापुढेही काँग्रेसला फार काही मिळणार नाही.


मला जम्मू-काश्मीरच्या लोकांना सांगायचे आहे की, तुम्ही मला साथ द्या, मी नेहमी तुमच्यासोबत उभा राहीन. मी नसतो तर संसदेत काश्मीरचा आवाज कोणीही उठवला नसता. १९९० च्या शोकांतिकेने काश्मिरी पंडित, मुस्लिम आणि शीखांसह अनेकांचे प्राण गेले. अनेक काश्मिरी पंडितांना पळून जावे लागले. काश्मीरचे मोठे नुकसान झाले, पण आता राज्याला सुधारण्याची वेळ आली आहे,' असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

कॅप्टन सभरवाल मानसिक तणावाखाली, आत्महत्येचा विचार करत होते? ९१ वर्षीय वडिलांकडून चौकशीची मागणी

एअर इंडिया विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा! मृत वैमानिक सुमित सभरलवाल यांच्या वडिलांचा आरोप नवी

अमेरिकेतली धक्कादायक घटना, पोलीस गोळीबारात भारतीय इंजिनिअरचा मृत्यू

हैदराबाद : तेलंगणातील ३२ वर्षांच्या मोहम्मद निजामुद्दीनचा अमेरिकेत स्थानिक पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला.

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक