धसई विभागातील वन्य प्राणी मोकाट; भात शेती संकटात

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यातील धसई विभागातील महाज, खेवारे, मांडवत, कळबांड, जायगाव, खेडले, तळवली, कांदली या गावातील शेतकरी वन्य प्राणी व मोकाट जनावरे यांच्यामुळे भात लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.


याकडे महसुल, वन व कृषी खात्याने विशेष लक्ष्य देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी सहकारी संघ मुरबाड माजी चेअरमन व कुणबी समाज संघटना मुरबाडचे सरचिटणीस प्रकाश पवार सर यांनी शासनाकडे केली आहे.


महाज येथील मनोहर विनायक सुरोशे या शेतकऱ्याचे जवळ जवळ एक हेक्टर भात शेतीचे वन्य प्राणी व मोकाट जनावरे यांनी ७० ते ८० हजार रुपयाचे नुकसान केले आहे. अशाच प्रकारचे नुकसान अनेक शेतकऱ्यांचे होत आहे. टोकावडे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी सदर नुकसानीचे पंचनामे करून जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


वन्य प्राणी व मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त झाला नाही, तर अनेक शेतकरी पुढच्या काळात भात व भाजीपाला लागवड सोडून देतील असे महाज येथील नारायण वामन सुरोशे या शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. लवकरच मुरबाड तहसीलदार व शासकीय अधिकारी मुरबाड व वनक्षेत्रपाल टोकावडे यांची शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन या वन्य व मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करण्यासाठी बैठक घेण्याचे प्रकाश पवार यांनी ठरवले आहे.

Comments
Add Comment

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे