धसई विभागातील वन्य प्राणी मोकाट; भात शेती संकटात

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड तालुक्यातील धसई विभागातील महाज, खेवारे, मांडवत, कळबांड, जायगाव, खेडले, तळवली, कांदली या गावातील शेतकरी वन्य प्राणी व मोकाट जनावरे यांच्यामुळे भात लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.


याकडे महसुल, वन व कृषी खात्याने विशेष लक्ष्य देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी सहकारी संघ मुरबाड माजी चेअरमन व कुणबी समाज संघटना मुरबाडचे सरचिटणीस प्रकाश पवार सर यांनी शासनाकडे केली आहे.


महाज येथील मनोहर विनायक सुरोशे या शेतकऱ्याचे जवळ जवळ एक हेक्टर भात शेतीचे वन्य प्राणी व मोकाट जनावरे यांनी ७० ते ८० हजार रुपयाचे नुकसान केले आहे. अशाच प्रकारचे नुकसान अनेक शेतकऱ्यांचे होत आहे. टोकावडे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी सदर नुकसानीचे पंचनामे करून जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


वन्य प्राणी व मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त झाला नाही, तर अनेक शेतकरी पुढच्या काळात भात व भाजीपाला लागवड सोडून देतील असे महाज येथील नारायण वामन सुरोशे या शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. लवकरच मुरबाड तहसीलदार व शासकीय अधिकारी मुरबाड व वनक्षेत्रपाल टोकावडे यांची शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन या वन्य व मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करण्यासाठी बैठक घेण्याचे प्रकाश पवार यांनी ठरवले आहे.

Comments
Add Comment

ठाण्याच्या मेट्रोचे डिसेंबरमध्ये होणार उद्घाटन, 'या' मार्गावर धावणार मेट्रो

ठाणे : ठाणे शहरातील पहिली मेट्रो सेवा डिसेंबर २०२५ मध्येच सुरू होणार आहे. उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

प्रायोगिक तत्वावर बदलापूर-अक्कलकोट बससेवा

बदलापूर  : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान थेट बससेवा सुरु केली आहे.

भिवंडीत शनिवारी २४ तास पाणीपुरवठा बंद

भिवंडी (वार्ताहर) : जुनी भिवंडीला पाणीपुरवठा करणारी मानसरोवर येथील मेन लाईन शिफ्टींगचे काम हाती घेण्यात येणार

बदली आदेशानंतरही ठामपाचे १७० कर्मचारी त्याच विभागात

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेचा अनागोंदी कारभार वारंवार उघड होत आहे. ठामपाच्या अतिक्रमण विभागातील १७०

ठाणे-घोडबंदरच्या वाहतूक कोंडीवर मराठी अभिनेत्याची मिश्कील पोस्ट

ठाणे - मुंबई आणि उपनगरांमध्ये माणसांप्रमाणेच वाहनांमध्येही वाढ होत आहे. तसेच शहरांमध्ये सुरू असलेल्या

आजपासून ९ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यात १० टक्के पाणीकपात

पाण्याचा काटकसरीने वापर करा : ठामपाचे आवाहन ठाणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतर्फे पिसे, पांजरापूर येथील