'शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका'

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यात शिवसेना आणि शिंदे गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्याची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


तर, आता शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका, अशी आक्रमक भूमिका शिंदे गटाने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क फ्रिज होण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.


मनपाने परवानगी दिली तर त्याला विरोध केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका, अशी भूमिकादेखील शिंदे गटाने घेतली असल्याचे म्हटले आहे.


दरम्यान, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचा आहे, तिथे मी सविस्तर बोलेन. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा, त्यामुळे बोलताना जपून बोलावे लागायचे. आता तसे नाही,’ असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपला दिला आहे. तर मेळाव्यासाठी शिवतीर्थ आम्हाला द्यावे, असा अर्ज शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे केला आहे.


तर तिकडे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ज्यांच्याबरोबर ४० आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा. असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे दसरा मेळावा सेनेचा की शिंदे गटाचा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा