'शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका'

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यात शिवसेना आणि शिंदे गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्याची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


तर, आता शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका, अशी आक्रमक भूमिका शिंदे गटाने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क फ्रिज होण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.


मनपाने परवानगी दिली तर त्याला विरोध केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका, अशी भूमिकादेखील शिंदे गटाने घेतली असल्याचे म्हटले आहे.


दरम्यान, दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचा आहे, तिथे मी सविस्तर बोलेन. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा, त्यामुळे बोलताना जपून बोलावे लागायचे. आता तसे नाही,’ असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपला दिला आहे. तर मेळाव्यासाठी शिवतीर्थ आम्हाला द्यावे, असा अर्ज शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे केला आहे.


तर तिकडे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ज्यांच्याबरोबर ४० आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा. असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे दसरा मेळावा सेनेचा की शिंदे गटाचा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र