राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला ; मुंबईत पुढचे तीन दिवस जोरदार पाऊस

  135

मुंबई : राज्यभरात विविध ठिकाणी जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने कोरडे झालेले रस्ते पुन्हा वाहू लागलेत. मुंबई आणि उपनगरात पावसाने जोर धरला असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.


पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत काल पुन्हा पावसाने राज्यात चांगलीच हजेर लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.


मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहेत. दादर, वरळी, प्रभादेवी, हाजीअली या परिसरात पहाटेपासूनच संततधार सुरू आहे. कांदिवली, बोरिवली, मालाडमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे.


रात्रीपासूनच मुंबईसह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा कमी झालेला जोर पुन्हा वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात आणि परिसरात चांगला पाऊस झाला आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र