मुंबई : राज्यभरात विविध ठिकाणी जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने कोरडे झालेले रस्ते पुन्हा वाहू लागलेत. मुंबई आणि उपनगरात पावसाने जोर धरला असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत काल पुन्हा पावसाने राज्यात चांगलीच हजेर लावली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर परिसरात चांगलाच पाऊस झाला आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातही दुपारपासून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहेत. दादर, वरळी, प्रभादेवी, हाजीअली या परिसरात पहाटेपासूनच संततधार सुरू आहे. कांदिवली, बोरिवली, मालाडमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे.
रात्रीपासूनच मुंबईसह परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा कमी झालेला जोर पुन्हा वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाने धुमाकूळ घातला. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात आणि परिसरात चांगला पाऊस झाला आहे.
मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे नाव…
मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घाटकोपरमध्ये रात्रीच्या वेळी औषधाच्या दुकानातून औषध…
'असे' असतील पर्यायी मार्ग मुंबई : भाषिक राज्याच्या स्थापनेचे स्मरण म्हणून दरवर्षी १ मे रोजी…
आम्ही मुंबई स्वच्छ केली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर कडाडून…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तान विरोधात एकवटला आहे. जो - तो पाकिस्तानची…
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश…