आरे दूध वाचविण्यासाठी संघटना एकवटल्या

  154

मुंबई (प्रतिनिधी) : एकीकडे मुंबईत गोकुळ, वारणा, कात्रजसारखी दूध पुरवठा कंपन्या नफ्यात असताना, आरे दूध मात्र नुकसान झेलत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे मुंबई दूध योजनेची दुरवस्था झाली आहे. आरे दूध केंद्र, महापालिका, शासकीय संस्था, रुग्णालय यांचा आरे दुधाचा बंद झालेला पुरवठा, कुर्ला डेअरी व वरळी डेअरी पूर्णतः बंद झाल्याने संपूर्ण मुंबईचे दूध वितरण अडचणीत सापडले आहे.


आरे दुग्ध शाळेला वाचवून मुंबई दूध योजना सक्षम करण्याकरिता कामगारांच्या सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, वितरकांच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी एकत्र येत आरे दुग्धशाळा बचाव समितीची स्थापना केली. भारतीय कामगार सेना, राष्ट्रीय श्रमिक आघाडी, अखिल महाराष्ट्र दूध विक्रेता संघ, महाराष्ट्र दूध वितरक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण दूध वितरक सेना अशा १५ संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.


आरे दुग्धशाळा ही पुरातन व मध्यवर्ती केंद्र असून येथून मुंबईभरचा दूध पुरवठा होतो. आता मात्र तिची दुरवस्था झाली असून ते बंद होण्याच्या मार्गावर आहे. कामगार व वितरक यांना दैनंदिन अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच आरे दूध वितरण बंद झाल्यामुळे आरे स्टॉलधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. मुंबईकरांना चढ्या दराने दूध विकत घ्यावे लागत आहे. या सर्व गोष्टींवर उपाययोजना करण्याकरिता व मुंबई दूध योजना सक्षम करण्याकरिता कामगारांच्या सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, वितरकांच्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची नुकतीच संयुक्त बैठक वरळी दुग्धशाळा येथे झाली.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)