मुसळधार पाऊसामुळे बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक राज्यात पूरस्थिती

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशातील बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे आपला शेजारी देश पाकिस्तानात देखील पुराने थैमान घातले आहे. पुरामुळे आत्तापर्यंत पाकिस्तानात १ हजार २०० जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरामुळे पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

बिहारमध्येही मुसळधार पावसामुळे नवे संकट ओढवले आहे. गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे बिहारमधील लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुसळधार पावसामुळे गंगा नदीची पाणी पातळी वाढली आहे. गेल्या आठवडाभरापासून पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून, त्याचा परिणाम पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्व घरे, रस्ते पाण्यात बुडाल्याची परिस्थिती आहे. लोक वाहतुकीसाठी बोटींचा वापर करत आहेत. मात्र सर्वांसाठी बोटींची व्यवस्था करणे हेही प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. मुंगेरच्या कुतुलपूरच्या रस्त्यांवर तीन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. लोकांना पाण्यातून जावे लागत आहे. पाण्याची पातळी आणखी वाढली तर लोकांना घरात राहणे कठीण होणार आहे.

बिहारची राजधानी पाटण्यात गंगेने उग्र रुप धारण केले आहे. येथील पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे. राजधानीच्या मौजीपूर येथील नदी पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेली शेकडो वाहने गंगेच्या पुरात बुडाली आहेत. मुसळधार पुराच्या वेळी वाहने वाहून जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी वाहनांना दोरीने बांधले आहे.

उत्तराखंडच्या धारचुलामध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हरदिया नाल्यातील भरावामुळे इथे बांधलेला पूल देखील वाहून गेला आहे. त्यानंतर आजूबाजूचे लोक अडचणीत आले आहेत. तसेच कर्नाटक राज्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. तिथेही या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्येही पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तानात मुसळधार पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. या पुरामुळे पाकिस्तानात खूप मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे सर्वत्र फक्त पाणीच पाणी दिसत आहे. तर पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लोकांना वाचवण्यात येत आहे. पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात भीषण पुराचा सामना करत आहे.

Recent Posts

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

6 minutes ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

8 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

9 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago