भाजपा-मनसे युतीचे संकेत!

  116

मुंबई : राज्यात येऊ घातलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे युतीचे संकेत दिसू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत मनसे आणि भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर तासभर खलबते झाली. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काल 'शिवतीर्थ'वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. आज थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील 'शिवतीर्थ'वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.


ते आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत. आमचे पारिवारीक संबंध आहेत. त्यामुळे ही मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले असून यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही बावनकुळे यांनी सांगितले. युतीचा निर्णय हा वरिष्ठांकडून घेतला जातो. पण आज मी त्यासाठी नव्हे तर आमचे चांगले संबंध असल्याने आणि राज यांचे हिंदुत्ववादी भूमिका कट्टर आहे. ती उद्धव ठाकरे यांच्यारखी बेगडी नाही. त्यामुळे राज आणि आमच्यात वैचारीक साम्य आहे. यामुळेच आमचे नेते राज यांना भेटतात. त्यामध्ये कोणतेही राजकीय उद्देश नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.


दरम्यान, भाजपा नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढणे हे भाजपा-मनसेच्या युतीचे संकेत मानले जात आहेत. दोन्ही पक्षांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीला सामोरं जातानाच्या रणनितीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि फडणवीसांच्या कालच्या भेटीचे वृत्त मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहे. पण जसजशी निवडणूक जवळ येईल, तसे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे.


शिवसेनेत फूट पडल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील अस्थिर राजकीय वातावरणाचा पक्षाला कसा फायदा होईल यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आगामी निवडणुकीत भाजपासोबतच्या युतीबाबतची चाचपणी करण्यासाठी सोमवारी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 'सागर' बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले