आला गणेशोत्सव अन् चाकरमानींची खरेदीसाठी लगबग…

Share

रचना लचके बागवे

आज लालबाग परिसर भाविकांच्या गर्दीने व्यापला आहे. गणपतीला गावाकडे जाण्यासाठी किंवा घरी गणपतीच्या आगमनाच्या तयारीकरिता खरेदीसाठी चाकरमानी गिरणगावात फिरतो आहे. सगळीकडे नुसता जल्लोष आहे. मोठमोठ्या गणपती मंडळांचे कार्यकर्ते लॉऱ्या – ट्रक घेऊन, ढोल ताशांच्या गजरात आपल्या बाप्पाला न्यायला आले आहेत. त्यांना बघायला आणि social media reels बनवण्यासाठी आणि हा सर्व उत्साह आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी दूरदूरहून कलाकार मंडळी आली आहेत. तसेच घरातील मंडळी काही ना काही खरेदीसाठी बाहेर पडली आहेत. लालबागच्या मार्केटमध्ये मिळणारे मसाले, चिवडा गल्लीतले चिवडा – लाडू – वेफर्स, तेथील छोट्या छोट्या दुकानांमध्ये मिळणारे विविध प्रकारची तोरणं, दिवे, पूजेचे सामान, गणपतीला सजवण्यासाठीची आभूषणे, मुकुट, माळा त्याचसोबत घरातील गृहिणींसाठीचे दागिने – टिकल्या, कपडे आणि सजावटीचे सामान, भांडी इत्यादी वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली आहे.

लालबागसारखेच सर्वच बाजार ओसंडून वाहत आहेत. गरिबातला गरीब व्यक्तीदेखील या उत्सवांसाठी काही ना काही पैसे जमवून, या दरम्यान आपल्या कुटुंबासाठी आणि बाप्पासाठी गोष्टी विकत घेतो आहे. या काळात अनेक लोकांचे उद्योग-धंदे उभे राहतात. अगदी छोट – छोट्या उद्योगांपासून ते अगदी मोठे व्यापारी ह्या उत्सवाच्या आर्थिक चक्रात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काम करतात. फक्त गणपतीचे १०-१५ दिवस व्यवसाय करणारे, भाविकांना पाणी – वडापाव, चिंच – कैरी, खेळणी विकणारे ते मोठंमोठाली होर्डिंग्ज लावून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या लोकांना आपल्या होर्डिंग्जवरील जाहिरातीच्या माध्यमातून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देणे आणि भाविकांना आपल्या जाहिरातींकडे आकर्षित करणे हे सर्व ह्या उत्सवात चालू असते. आपण सरळ साधा विचार केला तर फक्त गणेश उत्सवाच्या दरम्यान कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन मिळत असेल. गणेशमूर्ती बनवणाऱ्या लोकांना, ते बनवण्यासाठी वापरलेल्या सर्वसामान जसे माती, रंग, कपडा, मंडप उभारणारे लोकं, प्रसादासाठी आणि घरी पाहुणे मंडळींना देण्याकरिता सर्व जेवणाचे सामान, खाऊ, नारळ, पिठं, मसाले, भाज्या, फळं, इतर सर्व धान्य आणि बरेच काही…त्याचबरोबर सजावटीसाठी आरास, लायटिंग, फुलं, मखर, कंठी असं सर्व काही… आता मार्केटिंगच्या जमान्यात विविध प्रकारच्या जाहिराती, होर्डिंग्ज, स्पीकर्स, led screen, news channels वर जाहिराती… किती साऱ्या लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. एकूण हे सर्व एका आर्थिक चक्रासारखेच चालू होते. इथे गणेशोत्सव हे एक निमित्त असले, तरीही त्याच्या प्रेमामुळे किंवा हल्ली दिखाव्यामुळे हे एक खूप मोठे आर्थिक चक्र बनले आहे.

श्रावण महिना चालू होताच भारतात अनेक सणांची लगबग चालू होते आणि त्यासोबतच घरातल्या सर्व लोकांची आणि अप्रत्यक्षरीत्या उद्योग व्यवसायाची देखील. गेली दोन वर्षं हे आर्थिक चक्र कुठे तरी विस्कळीत झाले होते, पण या वर्षी ते दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी फक्त गणपती विसर्जनाला ढोल-ताशांचा गजर व्हायचा, पण आता एक आठवड्यापूर्वीच गणरायाचे आगमन हा देखील एक सोहळा झाला आहे. आता विविध ठिकाणचे राजे, इच्छापूर्ती, चिंतामणी मंडळ जल्लोषात हा उत्सव साजरे करत आहेत. नागपंचमी, रक्षा बंधन, गोपाळकाला, पोळा, गणपती आणि इतर सर्व. ह्या सर्व उत्सवात खरेदी – विक्रीमुळे आपले आर्थिक चक्र चालू राहते आणि पैसा बाजारात फिरत राहतो. इतर वेळेस लोकांची खरेदी करण्याची क्षमता कमी असते, पण ती या उत्सवांच्या दरम्यान आपसूकच वाढते. हेच आहेत आपले उत्सव आणि उत्सवाचे आर्थिक चक्र. ह्यात सर्व जण आपापली भाकरी शिजवण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्सव परंपरेचा – उत्सव प्रगतीचा. गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेछा!

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

43 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

2 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

3 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

3 hours ago