नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली. या विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
भारतीय संघाच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, ‘आज आशिया कप २०२२च्या सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. संघाने उत्तम कौशल्य आणि संयम दाखवला. विजयाबद्दल अभिनंदन.’
दहा महिन्यांपूर्वी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतीय संघ विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. रविवारी रात्री टीम इंडियाने या पराभवाचा हिशेब चुकता केला. त्यानंतर भारतीय संघाच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक होत आहे. जगभरातील मोठमोठ्या खेळाडूंनी भारतीय संघातील खेळाडूंची पाठ थोपटली आहे.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…