मुंबई (प्रतिनिधी) : गणेश उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईतील दादर फूल बाजारात फूल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा फुलांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे फुलांचे दर देखील निम्म्यावर आले आहेत. बाजारात चांगल्या प्रतीचा झेंडू ६० रुपये किलो तर पावसाने भिजलेला झेंडू ४० रुपये किलो असल्याची माहिती आहे. यासोबतच जास्वंद गुलछडी लिली गुलाब या फुलांची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे फुल विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार यंदा गणेश उत्सवासाठी मुंबईकरांना पुरतील एवढी फुलांची आवक बाजारात झाली आहे.
यंदा बाप्पांच्या स्वागतासाठी मुंबईनगरी सज्ज झाली असून बाजारपेठा फुलल्या आहेत. गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीकडे भक्तांची पावले वळली आहेत. गणपती पूजनासाठी चाफा, जास्वंद, दुर्वा, मोगरा, शेवंती फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. कोरोना काळात निर्बंधांमुळे सणांवर निर्बंध होते. मंदिरे बंद होती. परिणामी फूल लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र यंदा कोणत्याही निर्बंधांशिवाय सण जल्लोषात साजरे होत आहेत. परिणामी सणासुदीला फुलांची मागणी वाढली आहे. गणेशोत्सवात फुलांचे दर वाढल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु दादर फूल मार्केटमध्ये आवक वाढल्याने दर निम्म्यावर आले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर निर्बंध उठवल्यामुळे गणेशोत्सवासाठी ग्राहक फुलांची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मागणीपेक्षा अधिक फुले बाजारात
मुंबईतील दादर फूल बाजारात विक्रीसाठी येणारी फुले ही पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यातून येतात. यंदा शेतकऱ्यांनी फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड केल्यामुळे मागणीपेक्षा अधिक फुले बाजारात दाखल झाली आहेत. यामुळे बाजारात फुलांचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळते.
दादरच्या मीनाताई ठाकरे फूल मार्केटमध्ये फुलांचे दर
गुलाब : ५० रुपये डझन
झेंडू : ६० रुपये किलो
शेवंती : ६० रुपये किलो
जास्वंद : १५० रुपये शेकडा
दुर्वा : १० रुपये जोडी
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…